राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला घटक पक्ष आहे. संजय राऊत हे काही दिवसांपूर्वी खासदार श्रीकांत शिंदेंचं नाव घेताच थुंकले होते. त्यानंतर संजय शिरसाट यांचं नाव घेतल्यावरही थुंकले होते. मात्र आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भ वरुन सुरु होणारी शिवी देत मुंब्रा बंदचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्राचे पोलीस महासंचलाक, ठाण्याचे पोलीस आयुक्त यांनी गाझियाबादच्या आयपीएस अधिकाऱ्याने सांगितलेलं खरं आहे ते महाराष्ट्राला सांगावं अन्यथा आम्ही १ जुलैला मुंब्रा बंद करु. आमचं हे बोलणं मस्करीत घेऊ नका असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. गाझियाबादच्या पोलिसांनी असा दावा केला आहे की ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून मुंब्र्यातील ४०० मुलांचं धर्मांतर करण्यात आलं. हाच मुद्दा घेत जितेंद्र आव्हाड म्हणाले की ४०० मुलांच्या धर्मांतराचा जो आरोप होतो आहे त्यातली चार मुलं दाखवा ती मिळाली तर मी राजीनामा देईन. असं म्हणत त्यांनी शिवीगाळ केली आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
nashik, Fraud Case Registered Against Panjarpol , Nashik Panjarpol Sanstha Managers, Forged Letter, Allegedly Signed by Chief Minister, land acquisition panjrapole nashik, panjrapole nashik fraud, forged letter cm eknath shinde,
भूसंपादन प्रकरणात मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे बनावटपत्र, श्री नाशिक पंचवटी पांजरपोळ पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा
jitendra kumar trivedi bjp
भाजपाच्या ‘या’ नेत्यावर तृणमूल नेत्यांविरुद्ध कट रचल्याचा आरोप
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…

महाराष्ट्र शासनपुरस्कृत दंगली सध्या सुरु आहेत

महाराष्ट्रात सध्या जे काही सुरु आहे त्या दंगली शासन पुरस्कृत आहेत. गाझियाबादच्या एका आयपीएस अधिकाऱ्याने मुंब्रा या ठिकाणी ४०० मुलाचं धर्मांतर झाल्याचा दावा केला आहे. मुंब्र्याची ही बदनामी आहेच शिवाय हिंदू धर्मालाही बदनाम केलं जातं आहे. हिंदू धर्माची मुलं मूर्ख आहेत का धर्मांतर करायला? आयपीएस अधिकाऱ्याने पेपरवर संख्या दाखवावी. फक्त सनसनाटी निर्माण करण्यासाठी ही बातमी आहे असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ही या मस्करी लावली आहे का? तुम्ही एका शहराला बदनाम करता आहात. या शहराची अर्थव्यवस्था धुळीस मिळवता आहात असंही आव्हाड यांनी स्पष्ट केलं.

तर मी राजीनामा द्यायला तयार

हिंदू धर्माचा अपमान करणारे हे कोण लोक आहेत? ४०० मुलांचं धर्मांतर केल्याचा दावा करत आहात. चार मुलं दाखवा, मी राजीनामा द्यायलाही तयार आहे असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे त्याचवेळी त्यांचा तोल सुटला आहे आणि त्यांनी शिवीगाळ केली आहे.