अहिल्यानगर : बँका, पतसंस्थांसमोर लावलेल्या ग्राहकांच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून रोख रक्कम चोरणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीतील तिघांना राहुरी पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली. न्यायालयाने या तिघांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ही माहिती दिली. या टोळीकडून अशाच स्वरूपाचे अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. तसेच या टोळीत आणखी काही जणांचा समावेश असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पितला देवाधनम नागय्या (वय ३५), अवुला अमोसे थिप्पाईह (३७), कुणचाला चिन्ना रवि (३७, तिघेही रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दि. २८ मे रोजी राहुरी येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर सोमनाथ लक्ष्मण ढसाळ (रा. वाघाचा आखाडा, राहुरी) यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख रुपये चोरीस गेले होते. पोलीस निरीक्षक ठेंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणातून ही टोळी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तिथून तिघांना अटक केली. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या रकमेतील ६० हजार रुपये हस्तगत केले आहेत.
पितला देवाधनम नागय्या (वय ३५), अवुला अमोसे थिप्पाईह (३७), कुणचाला चिन्ना रवि (३७, तिघेही रा. आंध्र प्रदेश) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. दि. २८ मे रोजी राहुरी येथील स्टेट बँकेच्या शाखेसमोर सोमनाथ लक्ष्मण ढसाळ (रा. वाघाचा आखाडा, राहुरी) यांच्या मोटरसायकलच्या डिक्कीत ठेवलेले एक लाख रुपये चोरीस गेले होते. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषणातून ही टोळी छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तिथून तिघांना अटक केली. या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या रकमेतील ६० हजार रुपये हस्तगत केले आहेत.