Raj Thackeray on Hindi Compulsory from 1st Standard : राज्यात इयत्ता पहिलीपासून मुलांना तीन भाषा शिकण्याची राज्य सरकारकडून सक्ती केली जात आहे. देवेंद्र फडणवीस सरकार तिसरी भाषा म्हणून हिंदी रेटण्याचा प्रयत्न करत आहे. याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी विरोध करू नये यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज (२६ जून) राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मात्र, “पहिली-दुसरीतल्या कोवळ्या मुलांवर तीन-तीन भाषा शिकण्याची सक्ती मला मान्य नाही”, अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. परिणामी राज ठाकरे यांच्या घरून दादा भुसे रिकाम्या हाती परतले. पाठोपाठ राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षणमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी ६ जुलै रोजी आपण मुंबईत मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली आहे. गिरगाव ते आझाद मैदान असा हा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात कोणत्याही पक्षाचा झेंडा नसेल. सर्वपक्षीयांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन राज यांनी केलं आहे. राज ठाकरे म्हणाले, “राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे हे नुकतेच मला भेटून गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांची संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आहे. आम्हाला ती मान्य नाही असंही सांगितलं,” असे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान, राज ठाकरे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना देखील टोला लगावला आहे. राज म्हणाले, “आजवर महाराष्ट्रातील शिक्षणपद्धतीनुसार आपल्याला पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय होता. हिंदी किंवा संस्कृत या दोनपैकी कुठलीही भाषा आपण निवडू शकत होतो. त्याच शिक्षणपद्धतीत शिकून आपण मोठे झालो आहोत. त्या शिक्षणपद्धतीत शिकून लाखो डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तयार झाले. लोकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. महाराष्ट्र वेगवेगळ्या क्षेत्रात मोठा झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे यांचा दादा भुसेंना टोला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र हा जुन्या शिक्षण पद्धतीमुळेच इतका मोठा झाला आहे. असं असताना अचानक ही गोष्ट (तिसरी भाषा/हिंदी) का लादताय? पाचवीनंतर हिंदी भाषेचा पर्याय घेऊन तेच शिक्षण घेऊन दादा भुसे आज शिक्षणमंत्री झाले ना? त्यांना कोणी पहिलीपासून हिंदी शिकवलेली का?