महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. यावेळी राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप केला. तुम्हाला आरोप पटतोय की नाही, यासंदर्भात तुमचं मत नोंदवण्यासाठी लोकसत्ता डॉट कॉमच्या पोलमध्ये सहभागी व्हा.

“१९९९ ला राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रातील जातीपातीचं राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू झालं. आम्ही जातीपातून बाहेर पडत नाहीत, मग हिंदू कधी होणार,” असा सवाल राज ठाकरेंनी यावेळी बोलताना केला.