छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात राडा झाला आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर परिसरातील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात वाद झाला. काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांना आग लावली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचाराची घटना ताजी असताना पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील काही भागातही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रामनवमी निमित्त काढलेल्या प्रभू रामचंद्राच्या मिरवणुकीदरम्यान, कोलकात्यातील हावडा परिसरात हिंसाचार घडला. यावेळी काही समाजकंठकांनी अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी केली.

हेही वाचा- संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

विशेष म्हणजे सध्या रामजान सुरू असल्याने रामनवमीची मिरवणूक शांततेत काढावी. मस्लीमबहुल भागातून मिरवणूक काढू नये. चिथावणी देऊ नये, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. असं असूनही हावडा परिसरात हिंसाचाराची घटना घडली.

हेही वाचा- VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “या सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात ‘तर्क-वितर्क’ लावले जात आहेत.