छत्रपती संभाजीनगरमध्ये (औरंगाबाद) दोन गटात राडा झाला आहे. गुरुवारी रात्री दोनच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर परिसरातील किराडपुरा भागातील राममंदिराजवळ दोन गटात वाद झाला. काही तरुणांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर हा प्रकार घडला. यावेळी काही तरुणांनी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांना आग लावली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचंही बघायला मिळालं. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील हिंसाचाराची घटना ताजी असताना पश्चिम बंगाल आणि गुजरातमधील काही भागातही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रामनवमी निमित्त काढलेल्या प्रभू रामचंद्राच्या मिरवणुकीदरम्यान, कोलकात्यातील हावडा परिसरात हिंसाचार घडला. यावेळी काही समाजकंठकांनी अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी केली.

mahayuti, candidate, aurangabad constituency, lok sabha election 2024, Eknath shinde
महायुतीत औरंगाबादच्या उमेदवारीचा तिढा कायम
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
MP Udayanraje Bhosale reacts on being in touch with Sharad Pawar
सातारा: तुतारीचे काय, त्या आमच्या वाड्यातही वाजतात- उदयनराजे
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती

हेही वाचा- संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, पोलिसांच्या गाड्यांसह खासगी वाहनांची जाळपोळ, किराडपुरात दगडफेक

विशेष म्हणजे सध्या रामजान सुरू असल्याने रामनवमीची मिरवणूक शांततेत काढावी. मस्लीमबहुल भागातून मिरवणूक काढू नये. चिथावणी देऊ नये, असं आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलं होतं. असं असूनही हावडा परिसरात हिंसाचाराची घटना घडली.

हेही वाचा- VIDEO: पश्चिम बंगालमध्ये रामनवमी सणाला गालबोट, अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी

या संपूर्ण प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे. “या सगळ्या दंगली ठरवून घडवल्या जात आहेत” असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. संजय राऊतांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात ‘तर्क-वितर्क’ लावले जात आहेत.