पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी काल (१ ऑगस्ट) पुण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्याच्या व्यासपीठावर शरद पवारही उपस्थित होते. राष्ट्रवादीत एवढा मोठा भूकंप झाल्यानंतरही शरद पवार मोदींसह व्यासपीठार एकत्र आल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. शरद पवारही भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, या सर्व चर्चांवर आता ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलं, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राईक केला. हे पवार साहेबांचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राईकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा >> “लोकांना पूजा-अभिषेक, महाआरत्यांत गुंतवून…”, ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल;म्हणाले, “देशात गोमांस, लव्ह जिहाद…”

ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केलं, हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. मोदी व्यासपीठावर होते. पण लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या मनातील खदखद कायम आहे, असंही संजय राऊत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपाची जुनी नीती

हरियाणात हिंसाचार उफाळला आहे. याबाबत संजय राऊतांना विचारले असता ते म्हणाले की, “निवडणूक आल्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवा-पेटवी सुरू होईल. प्रत्येक राज्यात अशा दंगलींना सामोरे जावे लागेल. निवडणुका जवळ आल्यावर भाजपाकडून खेळली जाणारी ही जुनी नीती आहे.”