सांगली : रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शाळेची बस उलटून झालेल्या अपघातात ६ विद्यार्थी जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथे मंगळवारी सकाळी हा अपघात घडला असून या प्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात बस चालकासह शिक्षण संस्था चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी आनंद सागर या शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी बस (एमएच १२ एफसी ९११३) नरसिंगाव येथे पलटी झाली. या अपघातामध्ये विभावरी पोतदार, विकास पोतदार, ऋग्वेद चव्हाण, सान्वी सगरे, समृद्धी माळी, अनन्या पवार हे सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कवठेमहांकाळमधील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
Shanthappa Jademmanavar PSI
आईच्या मजुरीचं पांग फेडलंस! UPSC मध्ये सात वेळा नापास झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाची यशाला गवसणी
youth from pune who worked in merchant navy missing
मर्चंट नेव्हीत काम करणारा पुण्यातील तरूण बेपत्ता… झाले काय?

हेही वाचा : सायखेडा ग्रामपंचायतीने ठराव रद्द न केल्यास न्यायालयात धाव – प्रेमविवाहाची नोंद न करण्यास राईट टू लव्हचा आक्षेप

या प्रकरणी बस चालक तुषार माळी याच्यासह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिव यांच्याविरुद्ध कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.