शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारकडून मिळणाऱ्या सोयी सुविधांकरता सरकारच जनतेच्या दारी जात आहे. परंतु, या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पायपीट करावी लागत असल्याचा दावा राष्ट्र्वादी पक्षाचे राहुरी येथील आमदार प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी एक व्हिडीओच ट्विटरवरून शेअर केला आहे.

“‘शासन आपल्या दारी’ या शासनाच्या अतिरंजित उपक्रमामुळे संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील लोकांचे, विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. आज सकाळी हे विद्यार्थी शाळा, कॉलेजमध्ये जाण्यासाठी पायपीट करताना दिसले”, असा दावा प्राजक्त तानपुरे यांनी केला आहे.

हेही वाचा >> मुंबईत गटारांवरील ४०० झाकणं गायब, भंगार विक्रेत्यांना पालिकेची तंबी

“सर्व एस टी बसेस मुख्यमंत्री महोदयांच्या सेवेसाठी तैनात आहेत. यांच्याकडून कार्यक्रमासाठी गर्दी जमेना म्हणून खूप दुरून लोकं आणावी लागत आहेत, असे ऐकले. असो, त्यांना कार्यक्रमासाठी आणि भवितव्यासाठी शुभेच्छा!” असंही प्राजक्त तानपुरे म्हणाल.

दरम्यान, ठिकठिकाणी राज्य सरकारकडून शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवला जात आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा नागरिकांना लाभ मिळावा याकरता हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनासाठी खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विविध जिल्ह्यांमध्ये हजर राहत आहेत. या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील जनतेला वेठीस धरले जात असल्याचंही सांगण्यात येतंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आज शिर्डीत शासन आपल्या दारी

आज (१७ ऑगस्ट) अहमदनगर येथील शिर्डी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तारीख उपलब्ध होत नसल्याने या कार्यक्रमाला मुहूर्त मिळत नव्हता. परंतु, अखेर आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डी येथील काकडी विमानतळ परिसरात हा कार्यक्रम होणार आहे.