राष्ट्रवादी काँग्रेसला प्रफुल्ल पटेल यांच्यामुळे यश मिळालं आहे. माझ्यामुळे पक्षाला अपयश येत असेल, तर मी स्वीकारते. यालाच नेतृत्व म्हणतात. प्रफुल्ल पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्या नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांना २५ वर्षांपासून नेते मानलं आहे. त्यामुळे पटेल यांची पक्षात कशामुळे घुसमट होत होती, माहिती नाही. पटेल यांची खदखद आमच्या कानापर्यंत कधी आली नाही. प्रफुल्ल पटेल आठवड्यातून तीन वेळा शरद पवार यांना भेटायचे. सहा जनपथ हे जेवढं माझं तेवढंच प्रफुल्ल पटेल यांचंही घर होतं.”

हेही वाचा : “आदित्य ठाकरेंनी आमच्या सरकारला ‘सळो की पळो’ केलं नाहीतर…”, भाजपा खासदाराचा टोला

“दिल्लीमधील अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात कार्य करत आहे. यामुळे मराठी माणसाचे खूप मोठं नुकसान हा अदृश्य हात करीत आहे,” असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी परिवारवादाचा विरोध करतात. पण, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी स्वबळावर स्थापन केलेल्या दोन पक्षांना तोडण्याचे काम भाजपानं केलं आहे. ठाकरे आणि पवार यांनी शून्यातून पक्षनिर्मिती केली. दोन्ही पक्षांना तोडून भाजपानं महाराष्ट्राचं नुकसान केलं आहे,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.