गेल्या २५महिन्यांपासून देशभर स्वच्छता अभियानांतर्गत विशेष परिश्रम घेतले जात आहेत. गेल्या २० वर्षांपासून यासंबंधी विविध उपक्रम राबवले जात असले तरी स्वच्छतेच्या बाबतीत म्हणावी तशी जागरूकता दाखवली गेली नाही. गेल्या २५ महिन्यांपासून केंद्र सरकारने हा  प्रतिष्ठेचा केलेला असल्यामुळे देशभरात या मोहिमेत शासकीय यंत्रणा लक्ष घालते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात काही जिल्हय़ात अतिशय चांगले काम होते आहे. सिंधुदुर्ग हा जिल्हा हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून देशभर गाजला गेला. कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्हय़ातील कामही अतिशय चांगले आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक चांगले काम लातूर जिल्हय़ाचे असून राज्यात सर्वात कमी प्रतिसाद परभणी जिल्हय़ात मिळतो आहे. औरंगाबाद, धुळे, िहगोली, नांदेड, नंदुरबार, बीड, यवतमाळ या जिल्हय़ात अद्यापि ५० टक्केही काम झाले नाही. कोकणात स्वच्छतेच्या बाबतीत पूर्वीपासूनच जागरूकता आहे. वैयक्तिक स्वच्छता, घराची स्वच्छता व परिसर स्वच्छता याबाबतीत त्यांची मानसिकता बनलेली आहे. याउलट मराठवाडय़ात स्वच्छतेचा अभाव अधिक आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swachata abhiyan in india
First published on: 06-12-2016 at 02:42 IST