Raigad Khalapur Irshalgad Irshalwadi Landslide : रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याने आतापर्यंत पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक नागरिक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर एनडीआरएफची चार पथकं बचावकार्यासाठी इर्शाळवाडीत दाखल झाली आहेत. याशिवाय मुंबई आणि पनवेलहूनही तीन बचाव पथकं इर्शाळवाडीत दाखल झाली. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इर्शाळवाडी गावात दरड कोसळली आहे. परंतु, हा भाग दरडप्रवण क्षेत्रात नव्हता. तरीही येथे दरड कोसळल्याने चिंता व्यक्त केली जातेय. याबाबत देवेंद्र फडणवीसांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ते म्हणाले की, “भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहेत. जे दरडप्रवण क्षेत्र आहेत तिथे दुर्घटना होत नाहीत. जे यादीत नसतात, तिथे दुर्घटना होते. सध्या हवामानाचा पॅटर्न बदलेला आहे. सध्या कमी दिवसांत जास्त पाऊस असा पॅटर्न पाहायला मिळतोय. पावसाची टक्केवारी समानच असते. परंतु, जो पाऊस महिना-सव्वा महिन्यांत पडायचा तो पाऊस एक-दीड-तीन दिवसांत पडतोय.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then take the stance of forced migration fadnaviss warning on crack prone areas said goddess of konkan sgk
First published on: 20-07-2023 at 10:58 IST