लोकसत्ता वार्ताहर

नांदेड: गणेश विसर्जनाच्या दिवशी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर बिलोली तालुक्यातील बामणी या गावावर शोककळा पसरली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.

wild elephant created havoc in the district gadchiroli three women seriously injured in attack
रानटी हत्तीच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू ; दोघी गंभीर
Pimpri, police died, police hit by vehicle,
पिंपरी : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

बामणी गावाशेजारील शेततळ्यात सार्वजनिक गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर गणपती पाण्याच्यावर आल्याचे कोणीतरी सांगितल्यानंतर गावातील चार मुले शेततळ्याकडे गेले. तेथे गेल्यावर ते पोहण्यासाठी तळ्यात उतरले. पण नंतर त्यातील तिघेजणं पाण्यात बुडाले.

हेही वाचा… “दिवाळीनंतर देशात कत्तल की रात…”, प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

या चौघांमधील एक मुलगा मात्र तळ्याच्या बाहेर होता. आपले मित्र पाण्यात बुडत असल्याचे पाहून ही बाब त्याने गावात कळविली. पण ग्रामस्थ मदतीला येईपर्यंत देवानंद (वय १२) व पिराजी (वय ९) हे गायकवाड बंधू पाण्यात बुडाले होते. त्यांच्यासोबत वैभव दुधारे (वय १३) हाही बुडून मरण पावला. या घटनेनंतर बिलोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एका छोट्याशा गावातील तिघांना अचानक जलसमाधी मिळाल्यावर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.