जिल्हय़ात दोन ठिकाणी वीज पडून दोनजण ठार, तर दहा महिला जखमी झाल्या. पैकी तीन महिलांची प्रकृती गंभीर आहे. ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला बलाच्या धडकेत एक शेतकरीही ठार झाल्याची घटना घडली.
जिल्हय़ात रविवार दुपारनंतर अनेक ठिकाणी छोटय़ा-मोठय़ा पावसाच्या सरी आल्या. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील लक्ष्मण ऊर्फ बाळू रामचंद्र चौरे (वय १७) शेतात शेळ्या चारत असताना वीज पडल्याने ठार झाला. या घटनेत तीन शेळ्याही ठार झाल्या.
परळी तालुक्यातील िलबोटा येथे खुशालराम मुंडे यांच्या शेतात खुरपणीचे काम करणाऱ्या महिला पाऊस आल्याने झाडाखाली आडोशाला थांबल्या. मात्र, झाडावर वीज पडल्याने शीतल रावसाहेब राठोड (वय १५) ही मुलगी ठार झाली, तर अरुणा गणेश जाधव (वय २३), कविता गोिवद जाधव (वय २४), अनिता संजय राठोड (वय २५) गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर सात महिलाही या विजेच्या धक्क्याने जखमी झाल्या. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onबीडBeed
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two died in in thunderbolt
First published on: 26-08-2014 at 01:45 IST