पोलादपुर मधील देवळे धरणापाठोपाठ अलिबाग तालुक्यालतील उमटे येथील धरण धोकादायक बनले आहे. धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. धरणाच्या सांडव्याच्या भिंतीला भगदाड पडले आहे. त्याचे दगड निखळून पडल्याने ही भिंत कोसळून तिवरेसारखी आपत्ती? उदभवू शकते अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
अलिबाग तालुक्यातील ६२ गावे , वाड्यांना या उमटे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. हे धरण १९८० साली बांधण्यात आले आहे. त्यामुळे अलिबाग तालुक्यातील पाणी प्रश्न बऱ्याच अंशी सुटलेला आहे. जिल्हा परीषदेच्या अखत्यारीत असलेल्या या धरणाची योग्यारित्या देखभाल दुरूस्ती केली जात नाही. त्यामुळे या धरणामुळे धोका निर्माण होवू शकतो. सांडव्याची जी संरक्षक भिंत आहे या भिंतीचे दगड पडून गेले आहेत त्यामुळे भगदाड पडल्या सारखी स्थिती आहे .
धरणाच्या सांडव्याची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी अनेकदा केली. याबाबत रायगड जिल्हा परीषदेकडे पाठपुरावाही करण्यात आला.
स्थानिक तरूणांनी पत्रव्यावहारदेखील केला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. तक्रारीनंतर सांडव्याच्या खालील बाजूस तात्पुरती मलमपटटी करण्यात आल्याचे दिसून येते. रेती आणि सिमेंट वापरून खालील बाजूस दगड लावण्या त आले आहेत परंतु मुख्य सांडव्याच्या भिंतीला पडलेले भगदाड तसेच आहे .
या धरणाच्या सांडव्या ला धोका निर्माण झाला तरी त्याच्या खालील बाजूस असलेल्याल महान , रामराज बोरघर आदि १० ते १२ गावांना याचा फटका बसू शकतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .
दरम्या न दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परीषदेच्या अधिकाऱ्यांनी या धरणाला भेट देवून पाहणी केली. त्यानंतर आज ‘या धरणाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने येथे पर्यटकांना येण्याजस मज्जव आहे ’ अशा आशयाचे फलक या ठिकाणी लावण्यायत आले आहेत . मात्र येथील नागरीकांच्या मुळ दुखण्याकडे दुर्लक्ष होत आहे .
अशुदध पाणी पुरवठा
या धरणातून नागरीकांना अशुदध पाणी पुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी या धरणाच्या. जलशुदधीकरण प्रकल्पं व पाणी पुरवठा जलवाहिन्याच्या कामात झालेली दिरंगाई समोर आल्यानंतर काम हाती घेण्यात आले.
जलशुदधीकरण प्रकल्पाचे काम पूर्ण होवूनदेखील आजही ग्रामस्थांना गढूळ गाळयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थाच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
‘ धरणाच्या सांडव्याची दुरूस्ती. व्हावी यासाठी आम्ही सातत्याने जिल्हा परीषदेकडे पाठपुरावा केला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे जिल्हा परीषदेचे प्रशासन इथं तिवरे सारखी दुर्घटना होण्याची वाट पाहतेय का असा प्रश्न. आम्हाा पडला आहे . हे प्रकरण जिल्हात परीषद प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी आमची कळकळीची विनंती आहे ’
– कौस्तु्भ पुनकर , सदस्य बोरघर ग्रामपंचायत