Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. एकेकाळी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांनी आता मात्र त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना आंबडेकर यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणावर भाष्य केले. “आता धस (आमदार सुरेश धस) विरुद्ध जरांगे पाटील असे सुरू झाले आहे का? की हे दुसरे काही आहे?, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला. “भाजपाला पुन्हा सत्तेवर बसविण्यासाठी शेतकरी जसा दोषी आहे, तसे मनोज जरांगे पाटीलही दोषी आहेत. जे तुम्हाला मान्य करत नव्हते, त्यानांच मनोज जरांगेंनी सत्तेवर बसवले”, असाही आरोप आंबेडकर यांनी केला.

“मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. पण त्यांनी भाजपाला कधी लक्ष्य केले नाही. भाजपा एकेकाळी मनोज जरांगेंना मान्यता द्यायला तयार नव्हते, तरीही त्यानांच तुम्ही सत्तेवर बसवले”, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.

Sanjay Raut Answer to Sanjay Shirsat
Shivsena : शिवसेनेचे दोन संजय, रेड्याची शिंगं, कुंभमेळा चेंगराचेंगरी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
PM Narendra Modi on Swachh Bharat Abhiyan
Narendra Modi : नरेंद्र मोदींचं विरोधकांना उत्तर, “स्वच्छ भारत योजनेची खिल्ली उडवणाऱ्यांना सांगतो, आम्ही रद्दी विकून २३०० कोटींचा निधी…”
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई व्हावी, यासाठी जिल्हा जिल्ह्यातून मोर्चे निघत आहेत. तसेच या मोर्चात परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशीही मागणी केली जात आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण एकदा मागण्या केल्यानंतर कारवाईची सुरुवात झाल्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत थांबायला हवे. ज्यावेळेस प्रसंग घडला त्यावेळेस काहीच केले नाही. पण नंतर मोर्चे वैगरे काढणे योग्य नाही. संतोष देशमुख आणि सुर्यवंशी ही दोन्ही प्रकरणे वेगळी आहेत.

शेतकरी मूर्ख आहेत

तसेच कर्जमाफी विषयावर बोलत असताना प्रकाश आंबडेकर यांनी शेतकऱ्यांना मूर्ख असल्याचे संबोधले. ते म्हणाले, या सरकारने, आधीच्या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी, व्याज माफीचे आश्वासने दिली होती. साता बारा कोरा करण्याची भाषा वापरली गेली. मी शेतकऱ्यांना मूर्ख यासाठी म्हणतो, कारण त्यांनी सत्तेवर पुन्हा कुणाला बसवले? मग आता पुन्हा रडत बसण्याचे कारण काय? शेतामध्ये जे पेरता तेच उगवते, तसेच कर्ज माफी करणार नाही, असे म्हणणारे सरकार तुम्ही निवडून दिले. ते आता कर्जमाफी देणार नसतील तर त्यात नवीन काय?

Story img Loader