मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्राच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांचं १२ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. पण, अद्यापही सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे रविवारपासून उपोषण आणखी तीव्र करण्याचा इशारा जरांगे-पाटील यांनी सरकारला दिला आहे. यातच शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे.

“एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडून मराठा समाजाचं खच्चीकरण करण्याचं सुरू आहे,” असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

Thane education officer, suspension,
ठाण्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांना निलंबनाबाबत तूर्त दिलासा नाही, राज्य सरकारला राक्षे यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
High Court, CID Investigation, Ritu Malu, Hit and Run, Nagpur Police, Tehsil Sub Inspector Allegations, Police Protection, Medical Examination, CCTV Footage, latest news
रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
Pune Police, Kalyani nagar accident, Juvenile Justice Board, Vishal Agarwal, prosecution, accident car, passport, court hearing, charge sheet, bail, judicial custody
कल्याणीनगर अपघात प्रकरण : मुलाविरुद्ध सज्ञान समजून खटला चालविण्याची पोलिसांची मागणी
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
kolkata rape and killing supreme court asks centre states to take urgent steps for doctors safety
डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचला ; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र, राज्य सरकारांना निर्देश
Supreme Court warns state government regarding Ladaki Bahine Yojana print politics news
मोठी बातमी! कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल
Supreme Court Grants Bail To Manish Sisodia
सर्वोच्च न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर तरी ‘जामीन हा नियम आणि तुरुंगवास हा अपवाद’ हे प्रत्यक्षात येईल?

विनायक राऊत म्हणाले, “मराठा आरक्षणाचे मारेकरी म्हणून भाजपा आणि गद्दार सरकारचा उल्लेख करेल. मराठा समाजाचे नेते म्हणून मिरवणारे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी आहेत. मराठ्यांचे दोन्ही नेते सत्तेत असूनही समाजाचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू आहे. दोघांच्या माध्यमातून मराठ्यांचं नुकसान होत आहे.”

हेही वाचा : “माझ्या शब्दापुढे मराठा समाजाने जाऊ नये, कारण…”, मनोज जरांगे पाटलांचं आवाहन

“दिल्लीत आणि राज्यात सत्ता असतानाही मराठा आणि धनगर आरक्षमासाठी उचित पावलं उचलली जात नाहीत. उलट मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसून पोळी भाजण्याचं काम केलं जात आहे. शिंदे आणि पवार गटात मतभेद आहेत. एकमेकांच्या उरावर बसण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण, एक ना एक दिवस यांचं विसर्जन होणार आहे,” असेही विनायक राऊत यांनी म्हटलं.

हेही वाचा : सरकारच्या बंद लिफाफ्यावर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले, “सरकारने त्या आदेशात…”

“आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला धाब्यावर बसवून पुढे ढकलला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘मर्यादित वेळे’त निर्णय देण्यास सांगितलं होतं. पण, विधानसभा अध्यक्षांकडून ‘मर्यादित वेळ’ म्हणजे यांची सत्ता संपेपर्यंत, असा अर्थ लावला जात आहे. टोलवाटोलवीचं काम सुरू आहे,” असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केला.