भौगोलिक दृष्टय़ा मुंबईजवळ असल्याने रायगड जिल्ह्य़ात नागरिकीकरणाला वेग आला आहे. पनवेल, उरण, खालापूर, पेण, कर्जत आणि अलिबाग तालुक्यात शहरीकरणाला जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र वाढत्या शहरीकरणाबरोबरच त्यातून उद्भवणाऱ्या समस्यांनाही आता तोंड फुटले आहे. या विभागात तयार होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे तरी कसे? हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईची विस्तारीकरणाची क्षमता संपत आल्याने आता शहरीकरणाचा केंद्रबिंदू रायगडच्या दिशेने सरकला आहे. मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबईपाठोपाठ आता तिसरी मुंबई विकसित होऊ पाहते आहे. या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्य़ातील पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, पेण आणि अलिबाग तालुक्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. या परिसरात नागरीकरणाचे अनेक प्रकल्प सध्या प्रगतीपथावर आहेत. आठ हजारहून अधिक गृहनिर्माण प्रकल्प या दोन ते तीन वर्षांत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे अर्थातच नागरीकरणाला  गती मिळणार आहे.

More Stories onरायगडRaigad
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Waste management problem in raigad
First published on: 17-05-2016 at 01:58 IST