स्टार प्रवाहवरील ‘छत्रीवाली’ मालिकेत नवं वळण आलंय. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटू सत्य मधुरासमोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विक्रमने मधुराची माफी मागितली, तिला मनवण्याचा प्रयत्नही केला पण मधुरा मात्र तिच्या मतावर ठाम राहिली. मधुराच्या निर्णयाने खचलेला विक्रम आजही आपलं प्रेम विसरलेला नाही. नातं संपलं असलं तरी प्रेम नाही. आजही मधुरा परत येईल असा विश्वास त्याला वाटतोय. विक्रम-मधुराला पुन्हा एकत्र आणणारा क्षण मालिकेत येईल का याची उत्सुकता आहे.

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. मधुराचं मन पुन्हा जिंकण्यात विक्रमला यश मिळणार का? हे ‘छत्रीवाली’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Rr Vs Gt Ipl 2024 Sanju Samson 50th Match As Captain
RR vs GT : संजू सॅमसनने ५०व्या सामन्यात केला खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित शर्मासह तीन कर्णधारांना टाकले मागे
Rajasthan Royals Vs Royal Challengers Bangalore Match Updates in marathi
RR vs RCB : विराट कोहलीच्या नावावर झाली नकोशा विक्रमाची नोंद, आयपीएलमध्ये ‘हा’ विक्रम करणारा ठरला संयुक्त पहिला खेळाडू
Mohit Sharma on Ravi Shastri's Comment
GT vs SRH : वयांवरुन खिल्ली उडवणाऱ्या रवी शास्त्रींना मोहित शर्माचे चोख प्रत्युत्तर; म्हणाला, ‘माझं वय वाढतंय…’