अभिनेता कमाल आर खान सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाव्दारे तो नेहमीच विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींवर टीका करत असतो. यावेळी त्याने अभिनेता मोहित बघेलच्या निधनाचे निमित्त साधून सलमान खानवर निशाणा साधला आहे. दानशूर म्हणून मिरवणाऱ्या सलमानकडे मोहितला मदत करण्यासाठी वेळ नव्हता का? असा सवाल त्याने विचारला आहे. "मोहितने सलमानच्या 'रेडी' आणि 'जय हो' या दोन चित्रपटात काम केलं होतं. पण मोहितला श्रद्धांजली देण्यासाठीसुद्धा सलमानकडे वेळ नव्हता. सलमान बिंग ह्युमनचा मुखवटा लावून लोकांची मदत करतोय. खरं तर हे सर्व केवळ प्रसिद्धीसाठीच सुरु आहे." अशा आशयाचे ट्विट करुन कमाल खानने मोहितला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. Mohit worked with Sallu in film #Ready and #JaiHo! But Sallu didn’t get time to tweet #RIP also for the boy, forget to help him financially to fight cancer. This is the reality of so called good hearted bhai. He does everything for publicity and News. Being human is a cover. pic.twitter.com/NcWCZ9P0HM — KRK (@kamaalrkhan) May 25, 2020 प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. कर्करोगामुळे त्याचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. मोहित लहानपणापासून कर्करोगग्रस्त होता. अखेरच्या काही दिवसांमध्ये तो नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. परंतु कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयशी ठरले.