वीस वर्षांपूर्वी दोन काळवीटांची शिकार केल्याच्या प्रकरणात जोधपूरचे न्यायालय गुरुवारी निकाल देणार आहे. सलमान खानसह सैफ अली खान, नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही आज निकाल लागणार आहे. मात्र, या सेलिब्रिटींना अडचणीत आणणारे हे काळवीट शिकार प्रकरण नेमके आहे तरी काय याचा घेतलेला हा आढावा. 'हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सलमान, सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. चित्रीकरणादरम्यान जोधपूरनजीकच्या कनकनी खेड्यातील भगोडा की धानी येथे १-२ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केल्याचा सलमान खानवर आरोप आहे. शिकारीच्या वेळी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे तिथे उपस्थित होते. शिकार सलमाननेच केली त्या रात्री सर्व आरोपी एका जिप्सी कारमध्ये होते आणि सलमान ती चालवत होता. काळवीटांचा एक कळप दिसताच सलमाने गोळ्या झाडून त्यांपैकी दोघांना ठार मारले, असा दावा सरकारी वकिलांनी केला. या प्रकरणात सलमान विरोधात पुरावे देखील आहेत, असे सरकारी वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितले होते. सलमानच्या वकिलांचे म्हणणे काय? अभियोजन पक्षाच्या कथनात अनेक त्रुटी असून या प्रकरणातील आरोप सिद्ध करण्यात त्यांना अपयश आले आहे, असा दावा सलमानच्या वकिलांनी कोर्टात केला होता. काळवीट शिकार प्रकरण - घटनाक्रम २ ऑक्टोबर १९९८ - वनविभागाकडून तक्रार दाखल करण्यात आली. एकूण ७ आरोपी - सलमान, सैफ, सोनाली बेंद्रे, नीलम, तब्बू, दुष्यंत सिंग आणि दिनेश गावरे ९ नोव्हेंबर २००० - न्यायालयाने तक्रारीची दखल घेतली 19 फेब्रुवारी २००६ - आरोपींविरोधात आरोप निश्चित करण्यात आले २३ मार्च २०१३ - ट्रायल कोर्टाने सुधारणा आरोप निश्चित केले २३ मे २०१३ - मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुनावणीला सुरुवात फिर्यादी पक्षाने २८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली १३ जानेवारी २०१७ - साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण २७ जानेवारी २०१७ - जबाब नोंदवण्यासाठी सर्व आरोपी न्यायालयात हजर झाले १३ सप्टेंबर २०१७ - फिर्यादी पक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात २८ ऑक्टोबर २०१७ - बचावपक्षाकडून अखेरच्या युक्तिवादाला सुरुवात २४ मार्च २०१८ - ट्रायल कोर्टातील युक्तिवाद संपला. २८ मार्च २०१८ - ट्रायल कोर्टाने निर्णय राखून ठेवला ५ एप्रिल २०१८ - सलमान खान दोषी, इतरांची निर्दोष मुक्तता