बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) तब्बल चार वर्षांनंतर ‘लाल सिंग चड्ढा’ (Lal Singh Chadda) चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित हा चित्रपट ११ ऑगस्ट २०२२ रोजी चित्रपटगृहात दाखल होईल. सध्या आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ या ट्रेंडबाबत आमिरने पुन्हा एकदा आपलं मत व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षी लग्न अन् ३२ वर्षांचा सुखी संसार, मृणाल कुलकर्णी यांचे पतीबरोबरचे सर्वात सुंदर फोटो

Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
Pakistani actor Imran Abbas claims he was offered Aashiqui 2
“आशिकी २, पीके, हीरामंडीची ऑफर मिळाली होती,” पाकिस्तानी अभिनेत्याचा दावा; म्हणाला, “महेश भट्ट…”
Sharad Ponkshe son sneh ponkshe movie
शरद पोंक्षेंचा मुलगा सिनेसृष्टीत करतोय पदार्पण, पहिल्याच चित्रपटात वडिलांसह काम करण्याबाबत स्नेह पोंक्षे म्हणाला…

‘लाल सिंग चड्ढा’ ११ ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. पण त्याचपूर्वी प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. एका प्रमोशनल कार्यक्रमामध्ये आमिरला ‘बॉयकॉट लाल सिंग चड्ढा’ हा ट्रेंड आणि तसेच चित्रपटाबाबत होणाऱ्या नकारात्मक चर्चांबाबत विचारण्यात आलं. यामुळे आमिरने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं.

आमिर म्हणाला, “कोणत्याही गोष्टीबाबत मी कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याचं मला दुःख आहे. मला कोणालाही दुखवायचं नाही. जर कोणाला चित्रपट बघायचा नसेल तर मी त्यांच्या भावनांचा आदर करतो.” ‘लाल सिंग चड्ढा’ प्रदर्शनाच्या मार्गावर असताना सुरु असलेल्या वादामुळे चित्रपटाला कितपत फटका बसणार हा मोठा प्रश्नच आहे.

पाहा व्हिडीओ –

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ला होणाऱ्या विरोधावर कंगना रणौतची पोस्ट, म्हणाली, “…यामागे आमिर खानच”

“जेव्हा लोक बॉलीवूड आणि ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याबद्दल बोलतात तेव्हा मला खूप वाईट वाटतं. खासकरून लोक माझ्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्याची मागणी यासाठी करतात कारण, त्यांच्या मते मला भारत देश आवडत नाही. माझं आपल्या देशावर प्रेम नाही. पण हे सत्य नाही. काही लोकांना असं वाटतं की मी देश आवडत नसलेल्या व्यक्तींपैकी आहे आणि हे खूपच दुर्दैवी आहे. मी विनंती करतो की कृपया माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका. माझा चित्रपट पाहा.” असं आमिरने म्हटलं होतं.