बॉलिवूडमध्ये भरपूर नाव कमावले असले तरी अभिनेता पंकज त्रिपाठीला त्याच्या गावच्या मातीची ओढ कायम असते. शूटिंगमधून वेळ काढत तो आवर्जून त्याच्या गावी बिहारमधील गोपालगंजला भेट देत असतो. आताही तो त्याच्या गावी गेला आहे. मात्र यावेळी सुट्टी एन्जॉय करायला नाही तर, एका खास कारणासाठी तो तेथे पोहोचला आहे. अभिनेता पंकज त्रिपाठी एक अभियान घेऊन गावाला गेला आहे. या अभियानाचे नाव आहे ‘पर्यावरणासाठी सजगता अभियान.’ त्यानं या चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या गावापासूनच केली आहे.

हेही वाचा : जगभरात प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेबाबत ऐतिहासिक निर्णय

Summer desi jugaad
उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट देशी जुगाड; रिक्षाच्या छतावरील काम पाहून कराल कौतुक!
IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’

पंकज त्रिपाठी गोपालगंजजवळ बेलसंड गावात आला आहे. या पर्यावरण अभियानाबद्दल बोलताना तो म्हणतो, “ही खूप जुनी योजना आहे. वृक्षारोपण हे महत्त्वाचं आहे. दुसऱ्या गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक किलोमीटर एकही झाड नव्हतं, हिरवळ नव्हती. म्हणूनच इथे झाडं लावणं गरजेचं आहे. गावातल्या लोकांचा या वृक्षारोपण अभियानात सहभाग आहेच. त्याचबरोबर जिल्हा प्रसासनही मदत करत आहे. ५०० झाडं लावण्याचं आम्ही ठरवलं आहे. यामुळे लोकांमध्ये वृक्षारोपणाची जागृती वाढत आहे. रविवारी सुरू झालेल्या या अभियाना अंतर्गत आतापर्यंत ५१ झाडं लाऊन झालेली आहेत.”

आणखी वाचा : अभिनेत्री महिमा चौधरी यांचा ‘इमर्जन्सी’ चित्रपटातील फर्स्ट लूक आउट, दिसणार ‘या’ भूमिकेत

यावेळी पंकज त्रिपाठीचा भाऊ, विजेंद्र तिवारीही उपस्थित होता. त्याने या अभियानाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे. तो म्हणाला, “आमचे वडील बनारस तिवारी आणि आई हेमवती देवीच्या नावे ट्रस्ट केलाय. या ट्रस्टच्या वतीनं वृक्षारोपण केलं आहे. झाडांच्या निगराणीसाठी फाऊंडेशननं माणसं नियुक्त केली आहेत. ही मंडळी पुढील पाच वर्षं झाडांची देखभाल करतील. पुढची पिढी निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडांची गरज आहे.” पंजक त्रिपाठी याने घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत असून त्याला या अभियानासाठी सगळेजण शुभेच्छा देत आहेत.