सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांच्या खासगी आयुष्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नी राजोशी बरुआ (पिलू विद्यार्थी) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. यामुळे नेटकऱ्यांनी आशिष विद्यार्थींनी पहिल्या पत्नीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यास सुरुवात केली यावर आता राजोशी बरुआ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा : दीपिका पदुकोणने इन्स्टाग्रामवरील नावात केला मोठा बदल…जाणून घ्या कारण

Wife can file case of molestation against husband
पत्नी पतिविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करू शकते
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Couple Murdered Daughter In Law
Crime News : विष मिसळलेली ताडी दिली अन् दगडाने ठेचून… मुलाने मनाविरुद्ध लग्न केले, सासू-सासऱ्याने सुनेला संपवले
nouran aly on vivian dsena converting into islam
विवियन डिसेनाने दुसरं लग्न करण्यासाठी इस्लाम स्वीकारला? पत्नी म्हणाली, “आमच्या धर्मात स्त्रिया…”
oyo unmarried couples rules
OYO रुमध्ये आता अविवाहित जोडप्यांना ‘नो एंट्री’; नव्या वर्षात नियमांमध्ये मोठे बदल, जाणून घ्या
Groom dance with mother in his haldi on khandeshi song video goes viral on social media
“आये कर मन लगन” नवरदेवानं बायकोसोबत नाहीतर आईसोबत धरला खानदेशी ठेका; VIDEO झाला व्हायरल
Couples who are ineligible for marriage due to age restrictions are eligible to live-in
वयाच्या अटीमुळे लग्नास अपात्र जोडपे लिव्ह-इन करता पात्र!
Image of Criminal
२१ वर्षांच्या तरुणावर जडला महिलेचा जीव, लग्नास नकार दिल्याने केले धारदार शस्त्रांनी वार

राजोशी बरुआ यांनी ‘हिंदुस्थान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आशिष विद्यार्थी यांनी त्यांची कधीही फसवणूक केली नाही, ते दोघेही दोन वर्षांपूर्वी वेगळे झाले आहेत. राजोशी म्हणाल्या, “आम्ही दोघे २०२१ मध्येच वेगळे झालो होतो आणि गेल्या वर्षी घटस्फोट झाला. आशिषला घटस्फोटाबाबत सोशल मीडियावर कोणालाही सांगावे असे वाटले नाही. विभक्त झाल्यानंतरही आम्ही दोघे मित्र आहोत. आमच्या लग्नाची २२ वर्षे म्हणजे माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर काळ होता. आम्ही दोघांनी एकत्र प्रवास केला, आमच्या अनेक आवडीनिवडी सारख्या होत्या, आमच्यात भांडण कधीच झाले नाही तसेच आम्हाला एक मुलगा सुद्धा आहे.”

हेही वाचा : आमिर खानच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीचं मराठी ऐकलंत का? ‘पानी फाउंडेशन’चा कार्यक्रम पाहून नेटकरी म्हणतात “किरण मॅडम…”

राजोशी पुढे म्हणाल्या, “आम्हाला दोघांनाही आयुष्यात वेगवेगळ्या गोष्टी हव्या होत्या. यादरम्यान माझा कोणीही छळ केला नाही, गेल्या दोन वर्षांत आम्ही दोघेही आपल्या वाटेने जात आता चांगले आयुष्य जगत आहोत. सोशल मीडियावर केवळ अफवा सुरु असून आशिषने कधीही माझी फसवणूक केली नाही.”

दरम्यान, आशिष विद्यार्थी यांनीही दुसरे लग्न का केले याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले, “आयुष्यात मी एकट्याने राहून पाहिले परंतु मला जोडीदाराबरोबर राहण्यास खूप आवडते. मागच्या वर्षी मी रुपाली बरुआ यांना भेटलो आणि आम्ही लग्न केले. रुपाली ५० वर्षांची असून मी ६० नाही तर ५७ वर्षांचा आहे. माझ्या आयुष्यात जे झाले ते कोणाच्याही आयुष्यात होऊ शकते म्हणून कायम दुसऱ्यांचा सन्मान करा आणि इतरांचा आदर करा.”

Story img Loader