अक्षय कुमार आणि राणी मुखर्जी हे दोघेही बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांपैकी एक आहेत. दोघेही जवळपास तीन दशकांपासून बॉलिवूडमध्ये आहेत. मात्र, त्यांची जोडी पडद्यावर कधीच एकत्र दिसली नाही. असे नाही की त्यांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांच्यातील शीतयुद्धामुळे दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. राणी आणि अक्षय कुमारने एकत्र चित्रपट न करण्याचे कारण काय? जाणून घेऊया.
अक्षयने नव्वदच्या दशकात बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. दुसरीकडे, राणी बंगाली चित्रपटांमधील कामासाठी ओळखली जात होती. राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी ‘खिलाडियों का खिलाडी’ चित्रपटात काम करण्याची ऑफर आली. मात्र अक्षय सारख्या नवोदित व्यक्तीसोबत काम करण्याची तिची इच्छा नसल्याने तिने ही ऑफर नाकारली. त्यानंतर हा चित्रपट रवीना टंडनला देण्यात आला.
दोघांमधील तणाव फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नव्हता. १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ‘संघर्ष’साठी राणी निर्मात्यांची पहिली पसंती होती. तिने त्या चित्रपटात काम करण्यास होकारही दिला होता. मात्र अक्षयचे नाव ऐकल्यानंतर तिने चित्रपट करण्यास नकार दिला. राणीच्या जागी प्रिती झिंटाला संधी मिळाली.
हेही वाचा- “आमिर खान माझा चांगला मित्र होता, पण..”; कंगनाची पोस्ट चर्चेत, म्हणाली, “हृतिक रोशन…”
२००२ मध्ये ‘आवारा पागल दीवाना’ या चित्रपटासाठीही राणीची निवड झाली होती. मात्र तिने ती ऑफरही धुडकावून लावली. राणीने आपल्याबरोबर तीनदा काम करायला नकार दिला ही गोष्ट अक्षयला पटली नाही. त्यानंतर त्याने राणीसोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. राणीची कारकीर्द घटांगळ्या खात होती. ‘लागा चुनरी में दाग’, ‘ता रा राम पाम’, ‘थोडा प्यार थोरा मॅजिक’ सारखे बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकले नाहीत. पत्नीचे करिअर वाचवण्यासाठी पुढे आलेल्या आदित्य चोप्राने एका चित्रपटाची योजना आखली आणि अक्षयला त्या चित्रपटाचा नायक म्हणून ऑफर दिली.
असे म्हणतात ती स्क्रिप्ट अक्षयच्या खूप आवडली होती. मात्र राणीची या चित्रपटाची नायिका म्हणून निवड झाल्याचे समजताच त्याने या चित्रपटासाठी नकार दिला. त्यानंतर दोघे कधीच पडद्यावर एकत्र आले नाहीत. इतक्या वर्षांनंतरही या दोन्ही कलाकरांमधील शीत युद्ध अद्याप संपलेले नाही.