Bollywood Actor took 37 Retakes for One Kiss Scene : दरवर्षी शेकडो चित्रपट रिलीज होतात, त्यापैकी बहुतांशी चित्रपटांमध्ये किसिंग सीन असतात. हल्ली तर खूप कमी चित्रपट असतात, ज्यात किसिंग व रोमँटिक सीन नसतात. अशा दृश्यांचं शूटिंग खूप काळजीपूर्वक करावं लागतं. काहीवेळा कलाकार एकमेकांसोबत असे सीन शूट करण्यात कंफर्टेबल नसतात. बरेचदा सीन परफेक्ट आला नसेल तर रिटेक घ्यावे लागतात. पण एका अभिनेत्याने किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक घेतले होते.

होय. बरोबर ऐकलंत तुम्ही. या बॉलीवूड अभिनेत्याने आतापर्यंत १८ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी आठ चित्रपट सुपरहिट झाले आणि तीन चित्रपटांनी जबरदस्त कमाई केली, तसेच अनेक रेकॉर्ड मोडले. बॉलीवूडचा चॉकलेट बॉय असलेल्या या अभिनेत्याने एका किसिंग सीनसाठी तब्बल ३७ रिटेक घेतले होते. या रिटेकसाठी त्याने अभिनेत्रीला कारणीभूत ठरवलं होतं.

२०१४ मध्ये आलेल्या ‘कांची: द अनब्रेकेबल’ या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला होता. यामध्ये कार्तिक आर्यन व अभिनेत्री मिष्टी चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटात कार्तिकने एका मुलीच्या प्रेमात पडलेल्या तरुणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष घई यांनी केले होते. या चित्रपटात एका किसिंग सीनच्या शूटिंगचा किस्सा खूप गाजला होता.

“हा किसिंग सीन एवढा मोठा डोकेदुखी ठरेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्या दिवशी आम्ही प्रेमी युगुलांसारखे वागत होतो. पण एक सीन नीट शूट व्हावा, यासाठी आम्हाला ३७ रिटेक करावे लागले. शेवटी सुभाषजी आले आणि ‘ठीक आहे’ म्हणाले तेव्हा आम्हाला वाटलं की झालं बाबा एकदाचं,” असं कार्तिक या सीनच्या रिटेकबद्दल म्हणाला होता.

किसिंग सीनच्या रिटेकबद्दल कार्तिक आर्यन म्हणाला…

या सीनसाठी एवढे रिटेक घ्यावे लागले त्या गोष्टीला मिष्टी जबाबदार असू शकते, असं कार्तिकने त्या मुलाखतीत म्हटलं होतं. “त्यावेळी मिष्टी जाणूनबुजून सीन नीट करत नव्हती, अशी शक्यता आहे. सुभाष घई यांना एक पॅशनेट किसिंग सीन हवा होता आणि मला किस कसे करायचे हे माहीत नव्हतं. मी त्यांना विचारणार होतो, ‘सर, मला किस कसे करायचे ते दाखवा’,” असं कार्तिक म्हणाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कांची: द अनब्रेकेबल’मध्ये मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर, आदिल हुसेन, मुकेश भट्ट, चंदन रॉय सान्याल, रिषभ सिन्हा आणि महिमा चौधरी यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटात कार्तिक आर्यन बिंदा, तर मिष्टीने कांची नावाची भूमिका केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता.