Sunita Aahuja on Govinda: गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. सुनीता आहुजा या त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये गोविंदा व त्यांच्या नात्याबाबत वक्तव्य केले आहे.

आता सुनीता आहुजा यांनी एका मुलाखतीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो, यावर भाष्य केले आहे. सुनीता आहुजा यांनी नुकतीच डेक्कन टॉक्स विथ असीफला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुनीता आहुजा नेमकं काय म्हणाल्या हे जाणून घेऊ.

सुनीता आहुजा गोविंदाबाबत म्हणाल्या…

सुनीता आहुजा म्हणाल्या, “गोविंदा व माझ्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. त्याचे एखाद्या अभिनेत्रीबरोबर नाव जोडले जायचे, तेव्हा आम्ही खूप तरुण होतो. मी अनेक अफवा ऐकल्या नाहीत. जरी मी ऐकल्या असत्या तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम झाला नसता, कारण मी खूप खंबीर मनाची व्यक्ती आहे.”

गोविंदावर तिचा विश्वास आहे का असे विचारले असता, सुनीता आहुजा म्हणाल्या, “मी त्याच्यावर विश्वास ठेवायचे. आता माझा त्याच्यावर विश्वास आहे, असे म्हणू शकत नाही.”

सुनीता आहुजा पुढे म्हणाल्या, “अभिनेत्याची पत्नी होण्यासाठी मनावर दगड ठेवावा लागतो. कारण ते जास्त वेळ त्यांच्या पत्नींबरोबर नाही तर चित्रपटांतील नायिकांबरोबर घालवतात. मी गोविंदावर खूप प्रेम करते आणि कायम त्याच्यावर प्रेम करत राहीन.”

गोविंदाने पुन्हा बॉलीवूडमध्ये पुनरागमन करावे, याबद्दल सुनीता आहुजा म्हणाली, “गोविंदाची पत्नी म्हणून मी अजूनही त्याची आणि त्याच्या चित्रपटांची वाट बघत आहे. गोविंदाने काम केले पाहिजे. त्याने आधी त्याच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. तसेच त्याने किमान २० किलो वजन कमी करावे.”

गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा लग्नानंतर ३७ वर्षांनी घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर अभिनेत्याचे वकील ललित बिंदल यांनी स्पष्टीकरण दिलं. सुनीता आहुजाने सहा महिन्यांपूर्वी घटस्फोटासाठी अर्ज केला होता, त्यानंतर या दोघांमधले मतभेद सोडवले असून हे जोडपे सध्या एकत्र असल्याचे त्यांनी म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सुनीता आहुजा यांनी गोविंदा कोणत्या दुसऱ्या महिलेसाठी त्यांच्या कुटुंबाला सोडणार नाही, असा विश्वास व्यक्त केला होता. तसेच गोविंदा माझ्याशिवाय राहू शकत नाही, तसेच मीदेखील गोविंदाशिवाय राहू शकत नाही, असे वक्तव्य केले होते.