बॉलीवूड अभिनेता आणि आमिर खानचा भाचा इम्रान खान हा त्याच्या चित्रपटांबरोबरच वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहतो. काही दिवसांपुर्वी तो पत्नी अवंतिका मलिकबरोबरच्या नात्यामुळे चर्चेत आला होता. इम्रान आणि अवंतिका यांनी दहा वर्षांच्या अफेअरनंतर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांत त्यांना इमारा ही मुलगी झाली. पण दोघांमधील वादांमुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

इम्रान खानपासून विभक्त होण्याच्या संघर्षांबद्दल आणि आयुष्यातील या कठीण टप्प्याबद्दल अवंतिकाने नुकताच मोकळेपणाने संवाद साधला. याबद्दल नयनदीप रक्षितशी बोलताना अवंतिका म्हणाली, “मला बराच वेळ विश्वासच बसत नव्हता की, इम्रानपासून वेगळे होणे हे माझं वास्तव आहे. त्याच्यापासून दूर जाणं आणि हेच सत्य असल्याचं स्वत:ला सांगणं मला खूप कठीण गेलं. कदाचित हे मी ज्याप्रकारची व्यक्ती आहे त्यामुळे हे असावं.”

यानंतर अवंतिका म्हणाली, “माझ्या भीतीचं दुसरं कारण म्हणजे माझ्या पालकांचं अयशस्वी लग्न. माझं काम करण्यासाठी माझ्यावर नेहमीच हा दबाव असल्याचं मला वाटायचं. लहानपणी माझं जे वास्तव होतं; तेच मोठपणी असू शकत नाही यावर मी ठाम होते. त्यामुळे मला कायम ती भीती होती आणि ही भीती दूर जाणं तेव्हा माझ्यासाठी अशक्य होतं.” यानंतर अवंतिकाने मुलगी इमाराबरोबर घराबाहेर पडणं खूप कठीण गेल्याचं सांगितलं.

याबद्दल अवंतिका म्हणाली, “मुलीबरोबर घराबाहेर पडणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला सहन करावे लागलेले ते सर्वात वाईट क्षण होते. आता तुम्हाला काहीच माहिती नाही. पण याबद्दल मी खूप भाग्यवान आहे की, माझ्या अवतीभवती इतके लोक होते. माझे मित्र आणि माझ्या कुटुंबाने मला सांभाळलं आणि मला माझ्या या कठीण काळात खूप उत्तम साथ दिली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, इम्रान खान आणि अवंतिका मलिक यांनी २०११ मध्ये लग्न केले. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी २०१९ मध्ये वेगळे होण्याचा निर्णय घेतला. इम्रान खान आता गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. इम्रानच्या कामाबद्दल बोलायाचं झालं तर त्याने ‘किडनॅप’, ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘देल्ली बेल्ली’, मेरे ब्रदर कि दुल्हन’, ‘कट्टी बट्टी’ या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.