कंगना रणौत ही बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगना नेहमीच तिच्या दमदार अभिनयामुळे आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने ‘क्वीन’, ‘मणिकर्णिका’ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सध्या अभिनेत्री तिच्या ‘चंद्रमुखी २’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने राजकारणात येण्याविषयी भाष्य केलं आहे.

हेही वाचा : …अन् पोलिसाच्या रुपात श्रेयस तळपदेला दिसला देव, बाप्पाच्या दर्शनासाठी गेल्यावर आला ‘असा’ अनुभव, म्हणाला…

कंगना म्हणाली, “मी एक जागरुक आणि जबाबदार व्यक्ती आहे. मी राजकारणात येण्यासाठी माझी मतं मांडते किंवा काहीतरी वक्तव्य करते असा बऱ्याच लोकांचा गैरसमज आहे. पण, हे खोटं आहे. माझ्या मनात देशाविषयी खूप प्रेम असून मी एक देशभक्त आहे त्यामुळे मी वेगवेगळ्या विषयांवर बोलत असते. यामागे कोणताही गुप्त हेतू नाही. सध्या मी माझ्या आयुष्यात खूपच आनंदी आहे. आयुष्यात हा टप्पा गाठण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे.”

हेही वाचा : “मला ही साडी…”, वनिता खरातचे पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट, पतीच्या कमेंटने वेधले लक्ष

‘चंद्रमुखी २’ चित्रपटाच्या माध्यमातून कंगना तामिळ चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. यापूर्वी तिने ‘धामधूम’ आणि ‘थलायवी’ या तामिळ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याविषयी सांगताना ती म्हणाली, “राघव लॉरेंस सरांबरोबर काम करणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. तिन्ही तामिळ चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव खूपच चांगला होता.”

हेही वाचा : ‘उंच माझा झोका’ने लोकांपर्यंत पोहोचवलं पण…”, छोटी रमा साकारणाऱ्या तेजश्रीचा करिअरबद्दल खुलासा, म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘चंद्रमुखी २’नंतर कंगना रणौत लवकरच बहुचर्चित ‘तेजस’ चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री भारताच्या पहिल्या महिला फायटर जेट वैमानिकाची भूमिका साकारणार आहे.