अभिनेता शाहरुख व अभिनेत्री काजोल ही मोठ्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आहे. त्यांचा ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा आतापर्यंतच्या अनेक सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडते. पण, या दोघांची मैत्रीही खूप घट्ट आहे. काजोल व शाहरुख यांची मुलंही आता मोठी झाली असून तेही मित्र आहेत.

“हे लग्नाचं रिसेप्शन नाही”; आईच्या निधनानंतर आमिर खानला भेटताना हसणारा उदय चोप्रा ट्रोल, नेटकरी म्हणाले, “निर्लज्ज…”

man beats wife with baseball bat
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून पतीचा पारा चढला; बेसबॉल बॅटनं केली मारहाण; गुन्हा दाखल
Shatrughan Sinha condemns firing outside Salman Khan home
“या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”
Mira Bhayander BJP office bearer enters Shiv Sena Thackeray faction
राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंबामुळे उत्तर भारतीय नाराज; मिरा भाईंदर भाजप पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडला
loksatta analysis controversy over central government new regulation for artificial intelligence print exp
विश्लेषण : निवडणुकीच्या तोंडावर ‘एआय’ची मुस्कटदाबी का?

करण जोहरचा चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडमध्ये ‘कुछ कुछ होता है’चे स्टार्स म्हणजेच शाहरुख, काजोल आणि राणी यांनी हजेरी लावली होती. रॅपिड फायर राउंड दरम्यान करण जोहरने काजोलला आर्यन खान आणि निसा देवगणशी संबंधित एक प्रश्न विचारला होता. जर, आर्यन खानने जर निसा देवगणला पळवून नेलं, तर तुझी प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न विचारल्यावर काजोलची प्रतिक्रिया खूपच मजेदार होती. हा रॅपिड फायर राउंड होता, त्यामुळे काजोलने पटकन प्रतिसाद दिला. पण गंमत म्हणजे करणने हा प्रश्न विचारल्यावर शाहरुख हसत होता.

काजोलने करणच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं. ‘मी म्हणेन… दिलवाले दुल्हे ले जायेंगे,’ असं म्हणत काजोल हसायला लागली. व शाहरुखही हसायला लागला. पण नंतर तो म्हणाला की, या गोष्टीचा विचार करूनही त्याला टेन्शन येत आहे. “मला फक्त याचा विचार करूनही टेन्शन येतंय की काजोलशी मुलांमुळे नातं जुळेल,” असं शाहरुख म्हणाला आणि त्यानंतर राणी, काजोल आणि करण जोहरही मोठ्याने हसले होते.