Rajesh Khanna admitted he was envious of Amitabh Bachchan: दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांना भारताचे पहिले सुपरस्टार म्हणून संबोधले जाते. भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. आजही त्यांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसते.
राजेश खन्ना यांनी जितके यश, प्रसिद्धी पाहिली तितकाच पडता काळ पाहिला. त्यांच्या पडत्या काळाबद्दल, एका मोठ्या यशस्वी कारकिर्दीनंतर जेव्हा त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरू लागले. त्यावेळी राजेश खन्नांच्या वागणेदेखील बदलले. त्यांना पटकन राग येत असे, ते चिडचिड करत असत. जेव्हा अमिताभ बच्चन यांची अँग्री यंग मॅन ही ओळख राजेश खन्नांच्या रोमँटिक हिरोच्या प्रतिमेवर वरचढ ठरली. अमिताभ बच्चन यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. आजही त्यांचे चित्रपट गाजताना दिसतात.
अमिताभ बच्चन यांच्याबाबत राजेश खन्ना काय म्हणालेले?
एका मुलाखतीत राजेश खन्ना यांनी याबद्दल वक्तव्य केले होते. ‘लेहेरेन रेट्रो’ला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना म्हणालेले, “अमिताभ बच्चन यांनी माझ्याबरोबर आनंद या चित्रपटातून काम करण्यास सुरूवात केली होती. आता तो लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. माझ्या शुभेच्छा त्यांच्याबरोबर आहे. त्यांची प्रगती म्हणून मला कायमच आनंद होतो. त्यांनी आमच्याबरोबर काम करण्यास सुरुवात केली होती आणि आता ते खूप पुढे गेले आहेत. त्यांचा मला हेवा वाटतो. माझ्यासाठी आणि इंडस्ट्रीतील प्रत्येकासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.”
राजेश खन्ना असेही म्हणालेले, “मी नेहमीच रोमँटिक हिरो म्हणून काम केले. मी कधीही अॅक्शन हिरो म्हणून काम केले नाही. तसे करण्याची माझी महत्वाकांक्षादेखील नाही. रोमान्स, कॉमेडी, फॅमिली ड्रामा अशा चित्रपटांत मी काम केले आहे. प्रामाणिकपणे बोलायचे तर रोमान्सपेक्षा मोठी कोणती भावना असू शकते? प्रेमापेक्षा दुसरी कोणती भावना मोठी असते? मला आनंद आहे की मी अशा चित्रपटांत काम केले.”
राजेश खन्ना व अमिताभ बच्चन यांच्यामधील स्पर्धेबद्दल अनेकदा बोलले जाते. त्यांच्याबरोबर काम केलेले अनेक सहकलाकार किस्से सांगतात. अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांनी दोन्ही अभिनेत्यांबरोबर काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाखतीत अमिताभ बच्चन व राजेश खन्ना यांच्याबद्दल वक्तव्य केले होते. अमिताभ बच्चन यांच्या कामाप्रतिच्या समर्पणामुळे ते त्या स्टारडमपर्यंत पोहोचले. तर राजेश खन्ना हे त्या काळात अहंकारी असे म्हटले जायचे. पण ते त्यांना मोठ्या प्रमाणात मिळणारे कौतुक होते, त्यामुळे त्यांच्यात अहंकार होता. फक्त काहीच लोक त्या पातळीचे स्टारडम अनुभवले आहे.