बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित डंकी चित्रपट आज (२१ डिसेंबर) प्रदर्शित झाला. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबात प्रेक्षकांच्या मनात उत्सुक्ता होती. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता चित्रपटगृहामध्येही प्रेक्षक गर्दी करताना दिसत आहेत. दरम्यान चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर शाहरुखने सोशल मीडियावर ‘आस्क मी सेशन’ घेतलं. यामध्ये त्याने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

हेही वाचा-

Shriya Pilgaonkar reacts on fake news of being adopted by parents supriya sachin Pilgaonkar hrc 97
श्रिया सुप्रिया व सचिन पिळगांवकरांची दत्तक मुलगी आहे? स्वतः उत्तर देत म्हणाली, “माझं जन्म प्रमाणपत्र…”
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
kangana ranaut on rahul gandhi and sonia gandhi
‘राहुल गांधी आईच्या महत्त्वाकांक्षेला बळी पडलेला मुलगा’, ३ इडियट्स चित्रपटाचं उदाहरण देत कंगना रणौत म्हणाली…

शाहरुखला त्याच्या एका चाहत्याने विचारलं, सर गौरी मॅमला डंकी चित्रपट कसा वाटला? चाहत्याने विचारलेल्या या \ प्रश्नाला सुद्धा किंग खानने एकदम दिलखुलासपणे उत्तर देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.शाहरुख म्हणाला, गौरी म्हणाली की, ‘डंकी’ हा खूप अभिमानास्पद चित्रपट आहे. तिला ‘डंकी’ चित्रपट खूप आवडला आहे’.

डंकीने प्रदर्शनाअगोदरच अॅडवान्स बुकींगमधून मोठी कमाई केली होती. अॅडवान्स बुकींगमध्ये डंकी चित्रपटाचे ३ लाख ६४ हजार ४८७ तिकिटांच विक्री झाली होती. या बुकींगमधून १०.३९ कोटी रुपयांची कमाई केली होती. एवढंच नाही तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी डंकीचे १२ हजार ७२० शो चे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा- श्रेयस तळपदेला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज; त्याची पत्नी आनंद व्यक्त करत म्हणाली, “ही भयंकर घटना घडली त्या दिवशी…”

यंदाचे वर्ष हे शाहरुख खानसाठी खऱ्या अर्थाने ब्लॉकबस्टर ठरताना दिसत आहे. याअगोदर शाहरुखचे पठाण व जवान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २ हजार कोटी पेक्षा अधिक कमाई केली होती. ‘डंकी’ हा कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे जो राजकुमार हिरानी यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची कथा अवैध स्थलांतरावर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, सतीश शाह आणि बोमन इराणी यांच्या भूमिका आहेत.