scorecardresearch

Premium

जेव्हा अमिताभ बच्चन यांना डॉक्टरांनी केलेलं वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित, जया बच्चन यांनी हातात हनुमान चालीसा घेतली अन्…; नेमकं काय घडलं होतं?

अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे.

amitabh-bachchan-jaya-bachchan
अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाचा आज वाढदिवस. (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय व आदर्श कपल म्हणजे अमिताभ बच्चन व जया बच्चन. आज त्यांच्या लग्नाचा ५०वा वाढदिवस आहे. १९७३ साली विवाहबंधनात अडकलेल्या अमिताभ व जया बच्चन यांनी ५० वर्ष सुखाने संसार केला. पण या काळात त्यांच्यावर अनेक कठीण प्रसंगांचा सामना करण्याची वेळही आली. असाच एक प्रसंग १९८२ साली घडला होता.

२ ऑगस्ट १९८२ साली कुली चित्रपटाच्या सेटवर अॅक्शन सीक्वेन्स करत असताना अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. बंगळूर युनिव्हर्सिटी येथे अभिनेता पुनीत इस्सर यांच्याबरोबर अॅक्शन सीन शूट करताना चुकीच्या प्रकारे उडी मारल्याने त्यांना दुखापत झाली होती. यामध्ये त्यांना रक्तस्रावही झाला होता. सिमी गरेवाल यांनी त्यांच्या शोमध्ये अमिताभ बच्चन यांना याबाबत विचारलं होतं. त्यावेळी अमिताभ बच्चन यांनी या भयानक प्रसंगाबाबत भाष्य केलं होतं.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

हेही वाचा>> “शाळेत असताना माझ्याकडे कोणीही बघायचं नाही”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “त्या मित्राने मला प्रपोज केलं अन्…”

“शूटिंगदरम्यान झालेल्या अपघातात माझ्या आतड्यांना दुखापत झाली होती. माझ्यावर सर्जरी करण्यात आली होती. त्यामुळे मी कोमामध्ये होतो. त्यानंतर पाच दिवसांनी आम्ही मुंबईला गेलो. टाके तुटल्यामुळे पुन्हा एक सर्जरी करण्यात आली होती. तेव्हा मी १२-१४ तास बेशुद्ध होतो. माझं बीपी शून्य झालं होतं. नसांचे ठोकेही सापडत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी मला वैद्यकीयदृष्ट्या मृत घोषित केलं होतं,” असं त्यांनी सांगितलं.

जया बच्चन यांनीही अमिताभ बच्चन यांच्याबरोबर घडलेल्या या प्रसंगाचा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, “मी घरी माझ्या मुलांना बघायला गेले होते. रुग्णालयात परतताच माझ्या दीराने मला त्यांच्या प्रकृतीबद्दल सांगितलं. तेवढ्यात डॉक्टर आले आणि मला तुमच्या प्रार्थनाच आता मदत करू शकतात, असं म्हणाले. तेव्हा माझ्या हातात हनुमान चालीसा होती. पण, ती मी वाचू शकत नव्हते.”

हेही वाचा>> “माझ्या हातात काही नाही”, कुस्तीपटूंच्या आंदोलनावर मिथुन चक्रवर्तींनी सोडलं मौन, म्हणाले, “केंद्र सरकार…”

“डॉक्टर त्यांना वाचवण्यासाठी इंजेक्शन देत होते. हृदय पंप करुन त्यांना पुन्हा जीवनदान देण्याचा प्रयत्न करत होते, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होते. पण, जेव्हा डॉक्टरांनी प्रयत्न थांबवले, तेव्हा अमिताभ यांच्या हाताचा अंगठा मला हलताना दिसला. ते हालचाल करत होते आणि त्यांना पूर्नजीवन मिळालं,” असंही पुढे त्यांनी सांगितलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When doctor declared amitabh bachchan clinically dead jaya bachchan shared hanuman chalisa incident kak

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×