मला सलमान खानची नायिका साकारायची आहे, असं वारंवार सांगून थकलेल्या दीपिकाकडे तशा ऑफर्स आल्या होत्या. मात्र या ना त्या कारणाने तिचा सलमानबरोबरचा चित्रपट लांबणीवरच पडत होता. अखेर, शाहरूख खानबरोबर काम केल्यानंतर दुसऱ्या खानांकडे मोर्चा वळवणाऱ्या दीपिकाने कबीर खान दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी होकार दिला आहे. ‘बजरंगी भाईजान’च्या यशानंतर तिसऱ्या चित्रपटासाठी लगेचच कबीर आणि सलमान खान एकत्र येणार असून या चित्रपटासाठी नायिका म्हणून दीपिकाने होकार दिला आहे.

शाहरूख खानबरोबर पहिला चित्रपट करत बॉलीवुड प्रवेश करणाऱ्या दीपिकाने आपल्याला सलमान खानकडून पहिल्यांदा चित्रपट करण्याची संधी मिळाली होती, असं एका कार्यक्रमा दरम्यान सांगितलं. मात्र त्यावेळी तुलनेने खूपच नविन असलेल्या दीपिकाने अजून कॅ मेऱ्यासमोर काम करण्याची आपली तयारी नसल्याचे सांगत चित्रपटाला नकार दिला होता. त्यानंतर फराह खान दिग्दर्शित ‘ओम शांति ओम’ हा चित्रपट तिने केला. मात्र आपल्याला सगळ्यात पहिली संधी सलमान खानने देऊ केली होती, ही गोष्ट कायम मनात असल्याचे स्पष्ट करत त्याच्याबरोबर काम करायची इच्छाही तिने वेळोवेळी बोलून दाखवली होती.

The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
Salman Khan announces new film Sikandar on Eid
सलमान खानने चाहत्यांना दिली ‘ईदी’, नव्या चित्रपटाची केली घोषणा, दाक्षिणात्य दिग्दर्शक सांभाळणार दिग्दर्शनाची धुरा
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”

याआधी दीपिकाला ‘बजरंगी भाईजान’ चित्रपटासाठी विचारणा झाली होती. सूरज बडजात्या दिग्दर्शित ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये तर दीपिकाच काम करणार हे जवळजवळ निश्चित होता होता ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटामुळे तीही संधी गेली. यशराज प्रॉडक्शनच्या आगामी ‘सुलतान’ चित्रपटासाठीही दीपिकाला विचारणा झाली होती. मात्र तेव्हाही तिला नकार द्यावा लागला होता. अखेरीस दीपिका आणि सलमान या जोडीला एकत्र आणण्यात  दिग्दर्शक कबीर खानला यश मिळाले आहे. त्याच्या आगामी चित्रपटात ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सलमान खानच्या ‘सुलतान’चे आणि दीपिकाच्या पहिल्यावहिल्या हॉलीवुडपटाचे चित्रिकरण पूर्ण झाल्यानंतरच आपल्या चित्रपटाला सुरूवात होणार असल्याचे कबीर खानने स्पष्ट केले आहे.