दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ हा चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहे. एकीकडे अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटाच्या शेवटी अजय देवगण आणि रितेश देशमुख या दोन्ही बॉलिवूड अभिनेत्यांना खास धन्यवाद म्हणण्यात आले आहे. नुकतंच याबाबतचे कारण समोर आले आहे.

बॉलिवूड हंगामा या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसरा, या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी त्यांच्या टीमने अजय देवगणशी संपर्क साधला होता. त्यावेळी या चित्रपटाच्या टीमने अजयला पुष्पा चित्रपटाचा ट्रेलर ट्वीट करण्याची विनंती केली होती. त्यावेळी अजयने या टीमचा मान ठेवत आनंदाने होकार दिला होता. तसेच त्याने हा ट्रेलर ट्वीट करत अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळेच या चित्रपटादरम्यान त्याला स्पेशल थँक्स देण्यात आले आहे.

त्यासोबतच अभिनेता रितेश देशमुखने या चित्रपटाचा टीझर शेअर केला होता. तसेच रितेशनेही अल्लू अर्जुनचे कौतुक केले होते. रितेश आणि अजयने केलेल्या प्रमोशनमुळे चित्रपटाचे निर्माते फार आनंदात पाहायला मिळत आहेत. यामुळे त्या दोघांची नावे विशेष आभार म्हणून लिहिण्यात आले आहेत.

83 Movie : ‘तुझे कपडे तर…’ भर कार्यक्रमात दीपिकानं उडवली रणवीरच्या ड्रेसची खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सुपरस्टार’ अल्लु अर्जुन याचा ‘पुष्पा’ चित्रपट अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. हा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. आंध्र प्रदेशमधल्या डोंगराळ भागात सुरू असलेल्या लाल चंदनच्या तस्करीवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातील पात्र आणि कथा पूर्ण करण्यासाठी आणि रंगवण्यासाठी आणखी कालावधीची गरज असल्याने हा चित्रपट दोन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज केला जाणार आहे, असे निर्माते नवीन येर्नेनी यांनी सांगितले होते.