India First Horror Movie : आजकाल चित्रपट पाहण्याच्या आवडीसाठी बरेच कंटेंट आहेत. आजकाल लोकांमध्ये हॉरर चित्रपट पाहण्याची क्रेझ लक्षणीय वाढली आहे.
आज, हिंदी सिनेमा असो वा दक्षिण सिनेमा… हॉरर चित्रपटांची क्रेझ सर्वत्र आहे. तुम्ही ‘भूल भुलैया’ पाहिला असेल, ‘1920’ पाहिला असेल किंवा ‘स्त्री’सारखे भीतीदायक चित्रपट पाहिले असतील, ज्यांनी बॉक्स ऑफिसवर बरीच कमाई केली. पण, तुम्हाला भारताच्या पहिल्या हॉरर चित्रपटाबद्दलची माहिती आहे का? जर तुम्हाला माहीत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला ती सांगतो.
आजच्या काळात हॉरर चित्रपटांची क्रेझ खूप वाढली आहे. जर आपण अलीकडील चित्रपटांकडे पाहिले, तर आता निर्माते हॉरर चित्रपटांमध्ये विनोदाचा एक छोटासा तुकडा जोडत आहेत, ज्यामुळे हॉरर चित्रपट पाहणे टाळणाऱ्या लोकांनाही ते आकर्षित करू शकतील. पण, जेव्हा भारतातील पहिला हॉरर चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्यात विनोदी घटक नव्हता.
खरं तर, भारतातील पहिला हॉरर चित्रपट १९४९ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे नाव ‘महल’ होते. या चित्रपटाने प्रेक्षकांना खूप घाबरवले. हा चित्रपट कमाल अमरोही यांनी दिग्दर्शित केला होता आणि तो त्या काळात एक सुपरहिट चित्रपट ठरला होता.
पहिल्या हॉरर चित्रपटाचे प्रदर्शन झाले ७६ वर्षांपूर्वी
कमल अमरोही दिग्दर्शित ‘महल’ १९४९ मध्ये प्रदर्शित झाला. दोन तास ४५ मिनिटांच्या या हॉरर चित्रपटात त्या काळातील ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार, अभिनेत्री मधुबाला, एम. कुमार, कानू रॉय व लीला पांडे यांसारखे कलाकार मुख्य भूमिकांत होते. बॉम्बे टॉकीजच्या बॅनरखाली तयार झालेला हा चित्रपट त्या काळातील सर्वांत महागड्या चित्रपटांपैकी एक होता.
हॉरर चित्रपटाचे कलेक्शन
महागड्या स्टारकास्ट, भव्य सेट व सदाबहार गाणी यांसह ‘महल’मधील प्रत्येक दृश्य कमाल अमरोही यांनी अतिशय अचूकतेने चित्रित केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या वेळी हा चित्रपट नऊ लाख रुपयांत बनवण्यात आला होता, ज्याची किंमत आज १५ कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, त्या वेळी या चित्रपटाने अनेक पटींनी जास्त कमाई केली होती. असे म्हटले जाते की, त्याने १.२५ कोटी रुपये कमावले होते, ज्यांची आजची किंमत २१८ कोटी रुपये आहे.
हे गाणं ऐकून लोक घाबरायचे
महल चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ हे गाणं आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक मानले जाते. लता मंगेशकर यांच्या या गाण्यामुळे प्रेक्षकांना खरेच भय वाटायचे, आणि ते चित्रपटाच्या गूढतेत अजून भर घालायचे.
‘महल’ चित्रपटाची कथा
महल चित्रपटाची कथा रहस्य आणि पुनर्जन्माभोवती फिरते. कथेची सुरुवात हरी शंकर (अशोक कुमार) महल नावाच्या जुन्या हवेलीत येतो तेव्हा होते. हवेलीचा पहारेकरी त्याला तिथे राहणाऱ्या एका जोडप्याची दुःखद कहाणी सांगतो.
प्रेमीचा नदीत बुडून मृत्यू होतो आणि त्याची प्रेयसी कामिनी (मधुबाला)देखील लवकरच मरण पावते. हरी शंकरला कळते की, हवेलीचा मालक त्याच्यासारखाच होता. तिथे त्याला एका स्त्रीच्या सावलीचे अस्तित्व जाणवते.