गेल्या काही दिवसांपासून भारतभरासह महाराष्ट्रात अनेक दुर्दैवी आणि दुःखद घटना घडत आहेत, ज्यामुळे मन सुन्न झालं आहे. काही दिवसांपूर्वी पहलगाममध्ये झालेला हल्ला, मग वैष्णवी हगवणे प्रकरण, त्यानंतर नुकताच मुंब्रा रेल्वे स्टेशननजीक ट्रेनमधून पडून प्रवाशांचे झालेले मृत्यू. अशातच गुरुवार, १२ मे रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये दुर्दैवी विमान दुर्घटना झाली. या घटनांनंतर प्रत्येकजण विविध पोस्टद्वारे शोक व्यक्त करत आहेत.

१२ मे रोजी गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. यात दोन वैमानिक, १० क्रू सदस्य आणि २३२ प्रवासी असे एकूण २४२ लोक विमानात होते. या घटनेनंतर शाहरुख सलमानसह अनेक बॉलीवूड तसंच रितेश देशमुख, माधुरी दीक्षित अशा अनेक मराठी कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त केलं.

सोशल मीडियद्वारे मराठीमधील कलाकार वेळोवेळी त्यांची मतं आणि प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. पहलगाममधील हल्ला, वैष्णवी हगवणे प्रकरणीसुद्धा अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. १२ मे रोजी झालेल्या विमान दुर्घटनेबद्दल तेजश्री प्रधान, नेहा पेंडसे, मानसी नाईक, गौरव मोरे आणि जिनिलीया देशमुखसह अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली.

अमेय वाघ इन्स्टाग्राम स्टोरी

अशातच अभिनेता अमेय वाघने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे त्याने “कोणाचीच चूक नसेलही कदाचित पण या देशात माणसाच्या आयुष्याला किंमत नाही… हे अंतिम सत्य! खूप वाईट घटना!” असं म्हटलं. अमेयने काही तांसापुर्वी ही पोस्ट इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केली होती. मात्र काही वेळानंतर त्याने ही पोस्ट काढून टाकली. त्यानंतर अभिनेत्याने दुसरी पोस्ट शेअर केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
अमेय वाघ इन्स्टाग्राम स्टोरी

दुसऱ्या पोस्टमध्ये अमेयने “आजचा दिवस भयानक आहे. अशी दुःखद बातमी पचवणे कठीण आहे” असं म्हटलं आहे. या पोस्टसह त्याने दु:खी आणि हृदय तुटल्याचे इमोजीसुद्धा लिहिले आहेत. दरम्यान, अहमदाबाद विमान घटनेत १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश, १ कॅनडा आणि पोर्तुगालचे ७ नागरिक होते. विमानाने उड्डाण घेण्याच्या अवघ्या काही सेकंदात हा अपघात झाला असल्याची माहिती आहे.