अभिनेत्री क्रांती रेडकर आणि सरकारी अधिकारी समीर वानखेडे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले. क्रांती अनेक प्रसंगांमध्ये नवऱ्याला खंबीरपणे साथ देताना दिसते. या लोकप्रिय जोडीने अलीकडेच अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या ‘कपल ऑफ थिंग्ज’ या कार्यक्रमात सहभागी होऊन अनेक गोष्टींबाबत खुलासा केला. या वेळी क्रांतीने पती समीर वानखेडे यांचा कायम अभिमान वाटत असल्याचेही सांगितलं.

हेही वाचा : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अपूर्वा नेमळेकर ‘या’ भूमिकेत झळकणार, नवा प्रोमो पाहिलात का?

क्रांती रेडकर म्हणाली, “माझ्या नवऱ्याचं काम मी खूप जवळून पाहिलं आहे. समीर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मिळून जे काम केलंय ते खरंच खूप मोठं आहे. समीर यांचा रक्ताने माखलेला शर्ट मी स्वच्छ केलाय, त्यांच्या फाटलेल्या पॅन्ट्स मी फेकून दिल्या आहेत. बूटात राहिलेली माती मी साफ केली आहे. मला ते कोणत्या परिस्थितीत काय काम करतात याची पूर्णपणे कल्पना आहे. अनेकदा रात्री ते घरी येत नाहीत म्हणून काळजी वाटते. घराच्या बाजूने जाणार असतील, तर संपूर्ण टीमसाठी मी चहा आणि बिस्किट तरी घेऊन जाते. ड्रग्जविरोधात यांच्या टीमने जे काम केलंय ते खरंच खूप अभिमानास्पद आहे. आजही अनेक मुलांचे पालक यासाठी त्यांचे आभार मानतात. एवढंच नाहीतर आमच्या लग्नाच्या रिसेप्शनला सुद्धा हे तीन तासच थांबले होते. महत्त्वाच्या कामानिमित्त त्यांना जावं लागलं, त्यामुळे सगळ्या नातेवाईंकांना मी एकटी भेटले आणि वरातीत सुद्धा एकटी होते.”

हेही वाचा : “बरं झालं आईबरोबर एकही सीन नव्हता…”, विराजस कुलकर्णीने सांगितला ‘सुभेदार’च्या शूटिंगचा अनुभव; म्हणाला, “अंगावर काटा…”

समीर वानखेडे याविषयी म्हणाले, “माझ्या दोन्ही मुली मी कामावर जाताना झोपलेल्या असायच्या आणि मी जेव्हा परत यायचो तेव्हा सुद्धा त्या झोपलेल्या असायच्या. त्यांना पुरेसा वेळ केव्हाच देता आला नाही. अनेकदा क्रांती सुद्धा झोपलेली असायची त्यामुळे माझ्या कुटुंबियांशी मी फक्त फोनवर बोलायचो. त्या व्यतिरिक्त आमचं बोलणं नाही व्हायचं.”

हेही वाचा : आजोबा अरुण कदमांचा नातवाबरोबरचा पहिला फोटो समोर, त्यांची मुलगी पोस्ट शेअर करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कामावर रुजू होऊन मला आता १८ वर्ष पूर्ण झाली पण, आजपर्यंत एकदाही क्रांतीने कधीच तू आम्हाला वेळ देत नाहीस अशी तक्रार केली नाही. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, घरातील अन्य कार्यक्रम विसरलास अशी तक्रार तिने केव्हाच केली नाही.” असं समीर वानखेडे यांनी सांगितलं.