विजय देवरकोंडा व अनन्या पांडेचा ‘लायगर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. आपल्या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळणार याबाबत विजयला खात्री होती. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं नाही. अनन्याच्या अभिनयाची देखील नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली. तसेच बॉयकॉट ट्रेंडमुळे देखील हा चित्रपट चर्चेत आला. चित्रपटाला मिळालेल्या अपयशाबाबत आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी अजब वक्तव्य केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा – “माझी फसवणूक केली अन्…” बॉलिवूड निर्मात्याचे सनी देओलवर गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

काय म्हणाले राम गोपाल वर्मा?

पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘लायगर’ चित्रपट सुपरफ्लॉप का ठरला? यामागचं कारण राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले, “विजय देवरकोंडाने ‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान काही वादग्रस्त वक्तव्य केली. चित्रपटावर याचा नकारात्मक परिणाम झाला. राम चरण, अल्लू अर्जून, ज्युनिअर एनटीआर, प्रभास यांच्या तुलनेमध्ये विजय हिंदी प्रेक्षकांचं मन जिंकू शकला नाही. विजय देवरकोंडाच्या उद्धटपणामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.”

“त्याचबरोबरीने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर करण जोहरच्या चित्रपटांना सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. इतर दाक्षिणात्य कलाकारांप्रमाणेच विजयमध्ये नम्रता नसल्याचं दिसून आलं. म्हणूनच ‘लायगर’ला अपयश सहन करावं लागलं.” राम गोपाल यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

आणखी वाचा – “कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य

विजय-अनन्या ‘लायगर’च्या प्रमोशनसाठी देशभरात फिरले. या चित्रपटाबाबत बरीच चर्चा रंगली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी केलेला खर्च तसेच चित्रपटाची भव्यदिव्यता लक्षात घेता हा चित्रपट सुपरहिट ठरेल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र चित्रपटाची कथाच प्रेक्षकांच्या पसंती न पडल्याने चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्याचं चित्र पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma talk about vijay deverakonda ananya panday liger movie failure see details kmd
First published on: 16-09-2022 at 15:46 IST