छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका लोकप्रिय मराठी मालिकांपैकी एक आहे. या मालिकेत असलेल्या सगळ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याचे दिसते. नुकतंच मिलिंद गवळी यांनी ऑनस्क्रीन नातीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मराठी मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ही मालिका नेहमीच टीआरपीमध्ये वरच्या क्रमांकावर असते. लेखन आणि अभिनय या दोन गोष्टींमुळे या मालिकेने लोकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. या मालिकेमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचे लाखो चाहते आहेत. या लोकप्रिय मालिकेमध्ये अभिनेते मिलिंद गवळी हे अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा साकारतात. आता या मालिकेत एका नव्या चिमुरड्या कलाकाराची एंट्री झाली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत अभिषेक आणि अनघाला मुलगी झाली आहे. त्यामुळे अनिरुद्ध आणि अरुंधती आजी-आजोबा झाले आहेत. त्या निमित्ताने अनिरुद्धने एक पोस्ट शेअर आहे.आणखी वाचा : “दिघे साहेबांना भेटायचं भाग्य मला दोन वेळा लाभलं…”, ‘आई कुठे काय करते’मधील अनिरुद्धने सांगितल्या खास आठवणी मिलिंद गवळींनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते त्यांच्या ऑनस्क्रीन नातीबरोबर खेळताना दिसत आहे. यात ती चिमुरडीही छान खेळत प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहे. मिलिंद गवळींची पोस्ट गोड गोंडस परी राणी”त्विशा”“आई कुठे काय करते “ या मालिकेमध्ये देशमुख कुटुंबात आता आली आहे एकनवीन मेंबरकसली गोंडस आहे “त्विशा “ .सहसा लहान मुलं दुसऱ्या कोणाकडे अशी पटकन जात नाही,पण हे बाळ अगदी हसत खेळत माझ्याकडे आलं,असं वाटलं नाही की पहिल्यांदाच हिला आपण पाहिलंय,भेटलोय, अगदी आपल्या कुटुंबांमध्ये एक नवीन मेंबर आला आहे असंच वाटत होतं,तिने क्षणात सगळ्यांनाच आपलंसं करून घेतलं.लहान बाळ असेल तर आपोआपच भारी चैतन्य पसरतं,जीवन किती सुंदर आहे असं वाटायला लागतं,चेहऱ्यावरील निरागस हास्य,आमच्या सेटवरचे वातावरणच बदलून गेलं आहे.प्रेक्षकांना सूधा खूप छान वाटणार आहे बाळाच्या आजूबाजूला घडणारे प्रसंग बघून, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे. आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या महाअंतिम सोहळ्याच्या जय्यत तयारीला सुरुवात, तारीख आली समोर दरम्यान सध्या आई कुठे काय करते ही मालिका चांगलीच रंजक वळणावर पाहायला मिळत आहे. या मालिकेत सध्या अभिषेक आणि अरुंधतीमध्ये खटके उडाल्याचे पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे अभिषेकच्या वागण्यामुळे अनघाही खचली आहे. त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानचे फोटो, व्हिडीओ ते सतत सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.