सध्याच्या काळात टीआरपीवरून संबंधित मालिकेची लोकप्रियता ठरवली जाते. छोट्या पडद्यावरील प्रत्येक वाहिनीला टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहायचं असतं. त्यामुळे मालिकेत दरवेळी नवनवीन ट्विस्ट, रंजक वळण, नव्या कलाकारांची एन्ट्री करून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात येतं. तर, अनेकदा कमी टीआरपीमुळे जुन्या मालिका बंद करून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. गेल्या महिन्याभरात ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली आहे. आता लवकरच या मालिकांच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ जाहीर केली जाईल. परंतु, त्यापूर्वी एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

‘कलर्स मराठी’ वाहिनीवर काही दिवसांआधी ‘अंतरपाट’ आणि ‘अबीर गुलाल’ या दोन मालिकांची घोषणा करण्यात आली. या मालिकांचा पहिला प्रोमो देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. परंतु, अद्याप या मालिकांच्या प्रदर्शनाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आलेली नाही. परंतु, या नव्या मालिकांसाठी कलर्सवरील एक जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका नेमकी कोणती जाणून घेऊयात…

हेही वाचा : मराठी मालिका विश्वातील पहिलावहिला ‘एआय’ प्रयोग

कलर्सवर नव्या दोन मालिकांची घोषणा केल्यामुळे कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल गेली काही दिवस चर्चा चालू होती. अखेर काही कलाकारांनी शेअर केलेल्या इनस्टाग्राम पोस्टमुळे याबद्दल माहिती समोर आली आहे. ‘काव्यांजली’ मालिकेतील अभिनेत्री कश्मिरा आणि यामधील मुख्य अभिनेता पियुष रानडे यांनी यासंदर्भात इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. पियुषने मेकअपरुममधील एक व्हिडीओ शेअर करत त्यावर “विश्वजीत म्हणून शेवटचे काही दिवस…खूप खूप आभार” असं कॅप्शन दिलं आहे. याशिवाय कश्मिराने सुद्धा “काव्या म्हणून शेवटचे काही दिवस” अशी स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे आता वर्षभरातच ‘काव्यांजली- सखी सावली’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा : बेपत्ता गुरुचरण सिंगच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याचे वडील म्हणाले, “माझं वय झालं आहे, त्यामुळे…”

kashmira
कश्मिराची इन्स्टाग्राम पोस्ट
View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘काव्यांजली’ मालिका गेल्यावर्षी २९ मे २०२३ रोजी सुरू झाली होती. आता वर्षभरातच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सुरुवातीला या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु, सध्या याचा टीआरपी बराच खाली गेला आहे. कलाकारांनी स्टोरी शेअर केल्या असल्या तरीही वाहिनीकडून अद्याप अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आलेली नाही. आता कलर्स मराठीवर सुरू होणाऱ्या ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ मालिकांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.