‘सावळ्याची जणू सावली'(Savlyachi Janu Savli) मालिकेत नवे वळण येत आहे. या मालिकेत मोठी घटना घडणार असल्याचे पाहायला मिळत आहे. सावलीचे अमरबरोबर आणि सारंगचे अस्मीबरोबर काही दिवसांपूर्वी लग्न ठरले होते. हे दोघेही त्यांच्या लग्नासाठी आनंदी आणि उत्साही असल्याचे पाहायला मिळाले. आता हेच लग्न सावली आणि सारंगचे आयुष्य बदलवणार असल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. झी मराठीने सोशल मीडियावर या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

पारूच्या हजेरीत मैत्रिणीच्या आयुष्यात होणार उलथापालथ

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. प्रोमोमध्ये जगन्नाथने जाणीवपूर्वक तिलोत्तमाला सारंगच्या लग्नापासून दूर ठेवल्याचे पाहायला मिळते. तिला सारंगच्या कल्याणासाठी आणि त्याचे चांगले व्हावे यासाठी लग्नापासून दूर राहून एक पूजा करण्यासाठी सांगितले जाते. सारंग या सगळ्याला विरोध करत असतो, मात्र तिलोत्तमा त्याच्या भल्यासाठी हे करायला तयार होते. ती घरी पूजेसाठी थांबते आणि बाकी सगळ्यांना लग्नासाठी पाठवते. नाराज मनाने सारंग लग्नासाठी तयार होतो. दुसरीकडे सावली विठ्ठ्लाकडे आज खूप महत्त्वाचा दिवस असल्याचे म्हणत प्रार्थना करताना दिसते. यावेळी जगन्नाथची बायको सानिका असे मोठ्याने किंचाळताना पाहायला मिळते, ही त्यांच्या भूतकाळातील आठवण आहे. जगन्नाथ फोनवर म्हणतो, “दया नको, भीक नको, प्रायश्चित हवं आहे. आता लग्नमंडपात तुमच्यासमोर माझी दुसरी लेक उभी आहे, तिचा स्वीकार करा.” त्यानंतर सारंग आणि सावली अग्नीभोवती फेरे घेताना दिसत आहेत. पारूदेखील या सोहळ्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

हा प्रोमो शेअर करताना, “काय आहे सावळ्याच्या मनात, कुणाची लग्नगाठ बांधली जाणार या मंडपात..?”, अशी कॅप्शन दिली आहे.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अस्मीबरोबर सारंग आणि अमरबरोबर सावलीचे लग्न होणार होते, मात्र अस्मीला सारंगच्या आयुष्यात आणि अमरला सावलीच्या आयुष्यात जगन्नाथने आणले होते. त्यांना फक्त नाटक करायला सांगितले होते. अमर त्याचे काम करून त्याचे पैसे घेऊन जातो, मात्र अस्मी सारंगच्या प्रॉपर्टीच्या मोहात पडते. जगन्नाथला धोका देऊन सारंगबरोबर लग्न करण्याचे ठरवते, हे जगन्नाथला लक्षात येते. जगन्नाथ हा भूतकाळातील कोणत्यातरी घटनेचा बदला घेण्यासाठी हे सर्व करत असल्याचे मालिकेत दाखविलेल्या दृश्यावरून पाहायला मिळते.

हेही वाचा: “राजकारणाचा स्तर प्रचंड घसरला असला तरी…”, शशांक केतकरच्या पोस्टने वेधलं लक्ष, अभिनेत्याने अधिकृत भारतीय जनतेचा जाहीरनामा केला शेअर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, जगन्नाथचा बदला पूर्ण झाला तरी त्याचे परिणाम आता सावलीला भोगायला लागणार का, तिच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होणार, नेमंक असं काय घडणार ज्यामुळे सारंग सावलीबरोबर लग्न करायला तयार होणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.