‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यात हा कार्यक्रम अगदी यशस्वी ठरला. आता या कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांची एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही मालिका प्रसारित होणार म्हटल्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार असल्याच्या विविध चर्चा रंगत होत्या. आता या चर्चांवर समीर चौघुले यांनी उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा – “आम्ही दोघंही सिगरेट व दारू…” रितेश देशमुखने खासगी आयुष्याबाबत केलेलं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर येत्या ५ जानेवारीपासून प्रसारित होणार आहे. या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे यांसारखे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेमध्ये काम करताना दिसतील. शिवाय अभिनेते मकरंद अनासपुरे यांचीही या मालिकेमध्ये मुख्य भूमिका आहे.

‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये समीर चौघुलेंनी म्हटलं की, “‘पोस्ट ऑफिस उघडं आहे’ मालिकेचे प्रोमो जेव्हा प्रदर्शित झाले तेव्हा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. तुम्ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का बंद करत आहात? असंही विचारण्यात आलं.”

आणखी वाचा – लग्न झालं तरीही बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नाना पाटेकरांचं होतं अफेअर, दुसऱ्या लग्नाची बोलणी सुरू होताच…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“पण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ बंद होणार नाही. सोमवार, मंगळवार, बुधवार हा कार्यक्रम असणार आहे. तसेच गुरुवार, शुक्रवार, शनिवार ”’पोस्ट ऑफिस उघडं आहे’ ही मालिका असणार आहे. शिवाय या मालिकेची कथाही खूपच भन्नाट आहे.” म्हणजेच आता आठवड्यातील फक्त तीन दिवस प्रेक्षकांना ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पाहता येणार आहे.