उत्तरेकडील राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेश, कुल्लू, मनाली यांसारख्या ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या राज्यांमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर नागरिक पर्यटनासाठी येत असतात. नुकतंच एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत मिनाक्षी वहिनी हे पात्र साकारणारी अभिनेत्री स्वाती देवलने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. काही आठवड्यांपूर्वी स्वाती तिच्या कुटुंबाबरोबर हिमाचल, शिमला, कुल्लू या ठिकाणी फिरण्यासाठी गेली होती. मात्र आता या ठिकाणाची झालेली अवस्था पाहून तिने हळहळ व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

स्वाती देवलची पोस्ट

“आहे…. या शब्दात वर्तमान जीव, प्राण, अर्थ आहे… पण ‘होतं’ यात भूतकाळ… मागच्याच महिन्यात अगदी २ आठवडे तर झालेत फक्त… हिमाचल, शिमला, सिस्सू, कुल्लू आणि मनिकरण पाहिलं… आणि टीव्हीवर त्याच रस्त्यांची, वसाहतींची वाताहत पाहून मन भरुन आलं… ज्या रस्त्यांवर उभं राहून तिथल्या सौंदर्याला मनात, फोटोत कैद केले त्याची फार दुरवस्था झाली आहे. किंबहुना फक्त खुणा राहिल्या आहेत. ज्या गुरुद्वाराच्या पुलावर उभे राहून फोटो काढले. तोच वाहून गेला… संपलं क्षणात?

मन खिन्न झालं… ज्यांचं नुकसान झालं, त्यांना देव पुन्हा उभारण्याची हिंमत देवो. त्या ट्रीपमध्ये आमच्यारोबर असणाऱ्या ड्रायव्हरचं घर हिमालयमध्ये आहे. त्यांची चौकशी केली…ते बरे आहेत कळल्यावर थोडं बरं वाटलं”, असे स्वातीने पोस्टमध्ये म्हटले आहे.

swati deval post
स्वाती देवलची पोस्ट

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटात साधनाच्या सूनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण? जाणून घ्या

दरम्यान स्वातीने केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. स्वातीने त्यांच्या या ट्रीपचे अनेक फोटोही पोस्ट केले होते. तसेच ती व्हिडीओही शेअर करताना पाहायला मिळाली. स्वातीचा पती ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील प्रसिद्ध संगीत संयोजक आणि संगीतकार आहे.