अभिनेता अजिंक्य राऊत आणि अभिनेत्री जान्हवी तांबट यांची प्रमुख भूमिका असलेली ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अजिंक्यने साकारलेला राजवीर आणि जान्हवीने साकारलेली मयुरी आता घराघरात पोहोचली आहे. लवकरच मालिकेला रंजक वळण येणार आहे. राजवीर समोर भाऊसाहेब आणि मयुरी यांचं सत्य उघड होणार आहे.

मयुरीचा एक प्रेमळ मित्र तर भाऊसाहेबचा समजूतदार बॉस राजवीर हा एक सच्चा माणूस आहे. मयुरीकडे आकर्षित होणारा राजवीर आपल्या जवळच्या बॉडीगार्डला म्हणजेच भाऊसाहेबला आपल्या दिलाची कहाणी मित्रत्वाच्या नात्याने सांगत आलेला असतो. मयुरीला राजवीरचं प्रेम कळतंय पण परिस्थितीच अशी आली आहे की मयुरीला राजवीरवरचं प्रेम त्याच्यापासून लपवावं लागतंय. पण नियतीनेच आता मयुरी आणि राजवीर या दोघांना एकत्र आणलंय. आपण राजवीरची फसवणूक करतोय, असं मयुरीला वाटतं असत. त्यामुळे मयुरी आपल्या मैत्रिणीकडे मन मोकळं करत असते. तेव्हाच राजवीर तिला पाहतो आणि सगळं सत्य त्याच्या समोर उघडतं. मयुरी हीच भाऊसाहेब आहे, हे राजवीरला समजतं.

हेही वाचा – Video: ‘द आर्चीज’च्या स्क्रीनिंग दरम्यान ऐश्वर्या राय-बच्चनने भाचा अगस्त्यची केली चेष्टा, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा – सुबोध भावे हिंदी चित्रपटामध्ये का नाही दिसत? अभिनेता कारण सांगत स्पष्टच म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राजवीरने आजवर भाऊसाहेबशी एक मित्र म्हणून बोलताना आपल्या प्रेमाची कबुली आधीच दिली आहे. त्यामुळे मयुरी आपल्याविषयी काय विचार करेल? हा प्रश्न त्याला सतावेल की भाऊसाहेबने उर्फ मयुरीने राजवीरच्या साधेपणाचा फायदा घेतला असा त्याचा समज होईल? या दोघांच्या प्रेमाला लागलेलं हे ग्रहण आता तरी सुटणार का? राजवीर आणि मयुरी एकत्र येतील का? साधा-सरळ-समजूतदार राजवीर अशाही परिस्थितीत शांत चित्ताने विचार करून मयुरीची बाजू समजून घेईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर येत्या काळात मालिकेत पाहायला मिळणार आहे.