मराठी मालिका, वेबसीरिज, चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता फक्त इथवरच थांबली नाही तर तिने आता स्वतःचा व्यवसायही सुरू केला आहे. प्राजक्तराज हा तिचा नवा ज्वेलरी ब्रँड तिने लाँच केला आहे. एकाचवेळी अनेक कामांमध्ये प्राजक्ता व्यग्र आहे. दरम्यान यामधूनच छोटा ब्रेक घेत ती श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात पोहोचली होती.

आणखी वाचा – सैफ अली खानचं लग्न झाल्यावर लेकापासून विभक्त राहू लागल्या शर्मिला टागोर, म्हणाल्या, “आईला गृहित धरलं जातं कारण…”

महाशिवरात्रीनिमित्त काही दिवस प्राजक्ता श्री श्री रवीशंकर यांच्या बंगळूर येथील आश्रमात गेली. यादरम्यानचे काही फोटो व व्हिडीओ तिने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केले. आश्रमात बसून तिने जप केला. तिच्यासाठी हा अनुभव आनंदीदायी होता. या आश्रमातीलच प्राजक्ताचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये प्राजक्ता श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारताना दिसत आहे. तिचा हा प्रश्न लग्नाबाबत आहे. प्राजक्ता विचारते, “लग्न करणं गरजेचंच आहे का?”. यावर श्री श्री रविशंकर यांनी उत्तर दिलं की, “तू मला विचारत आहेस. असं असतं तर कधीच माझ्या बाजूला अजून एक खुर्ची लागली असती. लग्न केलंच पाहिजे हे काही गरजेचं नाही.”

आणखी वाचा – Video : …अन् भर पार्टीत जमिनीवर बसून रणबीर कपूरचा भन्नाट डान्स, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“खूश राहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही लग्न करुन खूश राहा किंवा एकटं खूश राहा. काही लोक लग्न करुनही दुःखी असतात. तसेच एकटं राहिले तरी दुःखीच असतात. तुम्ही निवडा तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे. आनंदी राहणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.” प्राजक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.