छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अनेक कलाकार घराघरांत लोकप्रिय होतात. ‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘का रे दुरावा’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागरने आज प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच स्टार मीडिया मराठीला दिलेल्या मुलाखतीत शीतलने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला आहे.

लग्न झालेलं नाही त्यामुळे लोक टोमणे मारतात असं अभिनेत्रीने या मुलाखतीत सांगितलं. शीतल म्हणाली, “लग्नाबद्दल प्रश्न विचारणं साहजिक आहेत. आयुष्य हे प्रत्येकासाठी सारखं नसतं. तुमच्या फूटपट्टीने इतरांचं आयुष्य तोलू मापू शकत नाही. हा माझा प्रवास आहे, मी एन्जॉय करते आहे. बरेचजण असे प्रश्न विचारतात. अनाहूत सल्ले देतात. इकडतिकडची स्थळं सुचवतात. मला राग येत नाही.”

salman khan
आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे
marathi actress Prajakta Gaikwad
दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीला ‘मराठी’ची भुरळ, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणते, “ओटीटीच्या स्पर्धेत मराठी…”
Janhvi Kapoor
“तिच्यात मला श्रीदेवीची…”, जान्हवी कपूरबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य, म्हणाला…
Prosenjit Chatterjee recalls working with Aishwarya Rai
“ती खूप…”, ऐश्वर्या रायबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचं वक्तव्य; दोघांनी २१ वर्षांपूर्वी ‘या’ सिनेमात केले होते रोमँटिक सीन
meezaan jaffrey anant radhika wedding
‘या’ अभिनेत्याने राधिका-अनंतची करून दिली ओळख? मुकेश अंबानींनी त्याला ३० कोटींची दिली भेटवस्तू? त्याचे वडील म्हणाले…
Zombivli, Sonakshi Sinha, sonakshi sinha new movie,
सोनाक्षी सिन्हाला ‘झोंबिवली’ आवडतो तेव्हा…
Sonakshi sinha reacts on pregnancy rumors
गरोदर असल्याने सोनाक्षी सिन्हाने केलं लग्न? अभिनेत्री प्रतिक्रिया देत म्हणाली, “आता बदल एवढाच…”
gauri kulkarni shares funny post on ambani increase jio recharge prices
“रिचार्जचे पैसे जस्टिन बिबरच्या खिशात…”, अनंत अंबानीच्या लग्न सोहळ्याबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली…

हेही वाचा : गोळीबार प्रकरणानंतर सलमान सेटवर केव्हा परतणार? वडील सलीम खान म्हणाले, “सरकारने आम्हाला…”

शीतल पुढे म्हणाली, “रस्त्यात आजीबाई विचारतात, तेव्हा मी सांगते, माझं अजून लग्न झालेलं नाही. तेव्हा त्या आजीबाईंना प्रश्न पडतो. अरे तुझं का लग्न झालं नाही? इतकी छान दिसतेस, मग का नाही झालं. आपले ठोकताळे असतात. तसं घडत नसलं की धक्का बसतो. समोरच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं नसतं. अमुक वयात शिक्षण पूर्ण करा, मग नोकरी करा. मग लग्न करा. मूलबाळ असा ठरलेला पॅटर्न आहे.”

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, केलेलं बिश्नोई समाजाचं कौतुक

“घर-फार्महाऊस-विदेशवारी. हे ठोकताळे आहेत. सगळ्यांचं आयुष्य तसं नसतं. तुम्ही त्यांच्या नजरेत अपयशी ठरता. माझ्यासारख्या अनेकजणी आहेत, अनेकजण आहेत. नाराज-निराश व्हायचं कारण नाही. मी माझी कंपनी एन्जॉय करते. हा लोनलीनेस नाही, हा सॉल्टिट्यूड आहे.” असं मत शीतलने मांडलं.