‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) मालिका कथानकामुळे वेगळी ठरताना दिसते. सावली, सारंग व या दोघांचे कुटुंब याबरोबरच जगन्नाथ व त्याची पत्नी अशी ही सगळीच पात्रे प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. याबरोबरच काही दिवसांपूर्वीच अभिने निषाद भोईरची मालिकेत एन्ट्री झाली आहे. देवा ही भूमिका अभिनेत्याने साकारली आहे. समोर आलेल्या एका प्रोमोमध्ये सावली त्याचा अपघात होण्यापासून वाचवणार असल्याचे दिसत आहे.

सावलीला तिच्या गरीब परिस्थितीमुळे व तिच्या सावळ्या रंगामुळे अनेकदा अपमान सहन करावा लागतो. आता पुन्हा एकदा तिला तिलोत्तमाच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. या सगळ्यात सावली व देवाची भेट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, सावलीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी काही स्त्रिया घरी आल्या आहेत. काळ्या रंगाचा तिरस्कार करणाऱ्या तिलोत्तमाला ते पाहून राग येतो. तिलोत्तमा त्यांना रागाने घराबाहेर जायला सांगते. ती सावलीला म्हणते, “या रंगाने माझ्या घराला नासवलं आहे”, असे म्हणत ती तिच्या कानाखाली मारते. पुढे ती सावलीचा हात धरत तिला ओढत घराबाहेर काढते आणि म्हणते, य़ा घराचे दरवाजे या पोरीसाठी मी कायमचे बंद केलेत.

पुढे याच प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, देवा त्याच्या ड्युटीवर आहे. तो एका रस्त्यावर असल्याचे दिसत आहे. त्याच्यामागून एक मोठी गाडी येते. त्याकडे देवाचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. सावली त्याला बाजूला ढकलते व म्हणते, “तुमचं लक्ष कुठे होतं?”, त्यानंतर देवा तिला म्हणतो, “तुम्ही या देवाचा जीव वाचवलात. ए सिस्टर आय एम कमिंग, पुन्हा आपली भेट नक्की होईल.”

मालिकेत दाखविल्याप्रमाणे विनम्र स्वभावाची सावली कितीही संकटे आली तरीही संयमाने त्याला सामोरी जाताना दिसते. कोणत्याही परिस्थितीत तिच्या कुटुंबाला त्रास होऊ नये याची ती काळजी घेताना दिसते. लहान भावाच्या औषधोपचारांसाठी पैसे मिळावेत म्हणून ती भैरवीच्या सांगण्यानुसार तिची मुलगी तारासाठी गाताना दिसते. भैरवीने कितीही अपमान केला तरी सावली तिचे कर्तव्य निभावण्यापासून मागे हटत नाही. आता अशा या गरीब घरातील, सावळ्या रंगाच्या मुलीचे श्रीमंत असणाऱ्या व सौंदर्याला अतिमहत्त्व असणाऱ्या घरातील सारंगबरोबर लग्न झाले आहे. हे लग्न दोघांच्याही मर्जीविरुद्ध झाले आहे. सारंगचे अस्मीवर प्रेम होते, मात्र जगन्नाथने बदला घेण्यासाठी सावली व सारंगचे लग्न लावून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता देवा सावलीला कशी मदत करणार, सारंगची यावर काय प्रतिक्रिया असणार, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.