छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. टीआरपीत सातत्य राखण्यासाठी दिग्दर्शक-निर्माते नेहमीच मालिकेच्या कथानकात नवनवे ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न करतात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका १७ ऑगस्ट २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली. गेली तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून नुकताच या मालिकेने ९०० भागांचा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा : “तुला या लूकमध्ये पाहून त्रास झाला”, विशाखा सुभेदारच्या पोस्टवर चाहतीची कमेंट; अभिनेत्री म्हणाली, “नसेल आवडलं…”

MP Prajwal Revanna Sex Scandal case
“आमच्यावर दबाव…”, प्रज्ज्वल रेवण्णा सेक्स स्कँडल प्रकरणातील महिलांचा वेगळाच दावा
Sachin Tendulkar Bandra House Neighbor Dilip Dsouza complaints
सचिन तेंडुलकरच्या मुंबईतील शेजाऱ्याने केली तक्रार; म्हणाला, “तुझ्या घराबाहेर इतका..”, लोकांनी दिला पाठिंबा, प्रकरण काय?
Cyber ​​fraud with woman,
“अनोळखी नंबरहून फोन आला अन् म्हणाला तुझ्या बाबांना…” बंगळुरूतील महिलेने सांगितली ऑनलाइन फसवणुकीची नवी पद्धत
Prajwal Revanna Blue corner notice
ब्लू कॉर्नर नोटीस म्हणजे काय? प्रज्ज्वल रेवण्णा यांना ही नोटीस का बजावली जाऊ शकते?
Women Lost 63 kg Weight With Protein Intake And Sleep
६३ किलो वजन कमी करताना महिलेने काय खाल्लं? डॉक्टरांनीही सांगितलं रोजच्या जेवणातील ‘या’ घटकाचं महत्त्व
Amit Mishra and Rohit Sharma Video Viral
VIDEO : ‘तू माझ्यापेक्षा फक्त तीन वर्षांनी मोठा आहेस…’, रोहितने अमित मिश्राच्या वयावर उपस्थित केला प्रश्न
Prajjwal Revanna
सेक्स स्कँडल प्रकरणात प्रज्ज्वल रेवण्णांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “लवकरच..”
Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत लवकरच एक नवीन ट्विस्ट येणार आहे. मालिकेतील खलनायिका शालिनी जयदीप-गौरीचा खून करुन त्यांचा शेवट करणार असा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. ही मालिका आज जवळपास ३ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेत आतापर्यंत शालिनीने गौरी-जयदीपच्या विरोधात अनेक कारस्थानं रचली परंतु, यात तिला यश मिळालं नाही.

हेही वाचा : Video: २ महिन्यांतच सुप्रिया पाठारेंच्या लेकाचं हॉटेल झालं बंद? व्हिडीओ शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “अनेकांचे फोन आले की…”

अखेर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमध्ये “मी गौरी-जयदीपच्या प्रेमाचा शेवट करणार” असं शालिनी रागात म्हणताना दिसत आहे. यात तिने दोघांनाही एका जंगलात झाडाला बांधून ठेवलं आहे. शालिनी या प्रोमोमध्ये जयदीपवर तलवारीने वार करत असल्याचं दिसत आहे. मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच वैतागले आहेत.

हेही वाचा : ‘हे’ आहे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावचं अभिनयाव्यतिरिक्त छुपं टॅलेंट, म्हणाली, “मला उत्तम…”

star pravah sukh mhanje nakki kay asta serial trolled
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या प्रोमोवर नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

नव्या प्रोमोवर नेटकऱ्यांनी “एकदाचा कर बाई त्यांचा शेवट…आणि संपवा हा कार्यक्रम”, “या मालिकेचा शेवट कधी करताय?”, “अरे यांना आवरा कोणीतरी…”, “एकदम वाईट मालिका”, अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.