‘ठरलं तर मग’ या मालिकेतील अभिनेता अमित भानुशाली घराघरांत लोकप्रिय झाला आहे. यामध्ये त्याने अर्जुन सुभेदार हे पात्र साकारलं आहे. मालिकेतील सायली-अर्जुनची जोडी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मालिकेमुळे अमितचा चाहता वर्ग गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. सध्या अमितने शेअर केलेल्या अशाच एका इन्स्टाग्राम स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

‘ठरलं तर मग’मधील अर्जुन सुभेदार नेहमीच गाडी किंवा रिक्षातून प्रवास करत असल्याचं आपण मालिकेत पाहिलं आहे. परंतु, खऱ्या आयुष्यात अमित खूपच वेगळा आहे. सध्या त्याच्या साधेपणाचं सोशल मीडियावर कौतुक करण्यात येत आहे. आलिशान गाडी किंवा रिक्षाने प्रवास न करता अमितने थेट मुंबईने लोकलने प्रवास करत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : “आम्ही दोघंही महाराष्ट्राच्या जनतेचे…”, अशोक सराफ यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान; पत्नी निवेदिता यांनी शेअर केला खास व्हिडीओ

मुंबईच्या भर गर्दीत प्रवास करूनही अमित उत्साही होता. “५ ते ७ ट्रेन सोडल्यावर मला आता गाडीत चढायला मिळालं” असं कॅप्शन अभिनेत्याने यातील एका फोटोला दिलं आहे. तर, दुसऱ्या फोटोमध्ये थोडीफार गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर त्याने “अखेर आता मी मोकळा श्वास घेऊ शकतो” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा : “महिलांनी एग्ज फ्रीज करावेत”, राम चरणच्या पत्नीने मातृत्वाबद्दल मांडलं मत; उपासना म्हणाली, “स्त्रियांना प्रसूती काळात…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
amit bhanushali
अमित भानुशाली

अमित भानुशालीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, आजवर त्याने छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिक साकारल्या आहेत. ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे अमितला घराघरांत पुन्हा एकदा एक नवीन ओळख मिळाली. अभिनेत्याला सर्वत्र अर्जुन सुभेदार या मालिकेतील नावाने ओळखू लागले आहेत. दरम्यान, रेल्वेने प्रवास केल्याने अभिनेत्याचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.