‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. एकत्र कुटुंब पद्धतीवर आधारित असलेली ही मालिका गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आली. आज मालिकेतील अप्पू म्हणजेच अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. याचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा – Bigg Boss 17: अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत झाली भावुक; म्हणाली, “तो खूप…”

Sriti Jha on people assuming her to be asexual
“मी अलैंगिक आहे का? असा पहिला विचार…”, प्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य; ‘त्या’ कवितेबद्दल म्हणाली, “लोक काय म्हणतील…”
kiran mane shared Janhvi Kapoor video
“बहुतांश मराठी अभिनेत्रींमध्ये ‘गांधी-आंबेडकर’ यांच्याविषयी बोलताना कुत्सित…”, जान्हवी कपूरचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंचं वक्तव्य
actor rohan patil who played role of manoj jarange share experiences during movie to media representatives
मनोज जरांगेची भूमिका करणारा अभिनेता म्हणाला ” दोनच दिवस उपाशी…”
manoj bajpayee
दिल्ली आवडते की मुंबई? अभिनेता मनोज बाजपेयींनी त्यांच्या खास शैलीत दिलं उत्तर; म्हणाले…
Rashmika Mandanna on atal setu
रश्मिका मंदानानं अटल सेतूचं कौतुक करताच काँग्रेसची खोचक पोस्ट; ‘गुड जॉब’ म्हणत दिली सविस्तर आकडेवारी!
chaya kadam
‘प्रथितयश दिग्दर्शकांचा नवोदितांना पाठिंबा हवा’
madhoo relation with hema malini juhi chawla
माहेरी हेमा मालिनी तर सासरी जुही चावलाची नातेवाईक आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री; म्हणाली, “त्यांनी माझ्या पतीच्या…”
naach ga ghuma marathi movie review by reshma raikwar
Naach Ga Ghuma Movie Review : मार्मिक घुमाख्यान

ऑक्टोबर २०२१ साली सुरू झालेली ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं आहे. शशांक, अप्पू, माई, दादा, विठू, सुवा, कूकी, पन्ना, बाबी आत्या ही पात्र आता महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली आहेत. मालिकेतील नवनवीन ट्वीस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. त्यामुळे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका टीआरपीच्या यादीतही पहिल्या दहामध्ये आहे. पण आता मालिका लवकरच ऑफ एअर होणार आहे. आज मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा शूटिंगचा शेवटचा दिवस आहे. यासंदर्भात तिने एक भावुक पोस्ट करून व्हिडीओ शेअर केले आहेत.

हेही वाचा – मनिष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत ऐश्वर्या राय-बच्चन व सलमान खानने एकमेकांना मारली मिठी? फोटो आला समोर

काल ज्ञानदाने इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा एक फोटो शेअर करत त्यावर लिहीलं की, “हाय अप्पू…आजच्या रात्रीची झोप खूप त्रासदायक असेल…कारण उद्या शेवटचा दिवस आहे, याची मी कल्पना करू शकत नाही…कानिटकर वाडा…आपण दोघेही आपल्या आवडत्या ठिकाणी भेटणार आहोत…पण उद्याचा दिवस आपण साजरा करूया.. लवकरच भेटू…प्रेम” या स्टोरीनंतर ज्ञानदाने आज सुमी म्हणजेच अभिनेत्री नम्रता प्रधानबरोबर मेकअप रुममधला व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ज्ञानदा म्हणतेय की, “शुभ प्रभात…आज आपला शेवटचा दिवस.” त्यानंतर अभिनेत्रीने आणखी एक स्टोरी टाकून लिहीलं, “चला आजचा शेवटचा दिवस अविस्मरणीय करू…”

हेही वाचा – “जगबुडी होईल पण ही मालिका…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’च्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, “भिकेचे डोहाळे…”

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेचा पहिला प्रोमो आल्यापासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ऑफ एअर होणार अशी चर्चा सुरू झाली होती. पण ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका बंद होणार नसून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं निश्चित झालं आहे.